शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

ओमायक्रोनच्या रुग्णांनी केले भारतभर देवदर्शन; शेकडो जणांना दिला प्रसाद, दोघाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 20:39 IST

Crime News : उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : केनियावरून वरून परतलेल्या चौघांपैकी तिघांना ओमायक्रोन झाल्याचे उघड झाले असून त्यापैकी दोघेजण विलगिकरणात असताना देवदर्शन यात्रा करून आले. यात्रे दरम्यान त्यांनी शेकडो जणांना ओमायक्रोनचा प्रसाद दिला असून या कृत्या बाबत महापालिकेने त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणारे कल्याणी कुटुंबातील चौघेजण १७ डिसेंबर रोजी केनियातून परत आले. महापालिका आरोग्य विभागाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर, २१ डिसेंबर रोजी त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यांची आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट येईपर्यंत त्यांना घरातच विलगिकरणात राहण्यास बजाविले. मात्र कुटुंबांनी महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवून देवदर्शन व सहलीसाठी काश्मीर, वैष्णोदेवी आणि अमृतसर येथे गेले. दरम्यान ४ पैकी तिघांचा आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शहरात ओमायक्रोन रुग्ण आढळल्याने, महापालिका आरोग्य विभागाचे पथक कल्याणी यांच्या घरी त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी गेलेअसता, कुटुंब सहलीसाठी गेल्याचे उघड झाले. महापालिका आरोग्य यंत्रणेला धक्का बसला असून ओमायक्रोन पॉसिटीव्ह रुग्णांनी प्रवास दरम्यान किती जणांना प्रसाद दिला?. असा प्रश्नचिन्हे उभा ठाकला आहे.

 महापालिका आरोग्य विभागाने, कल्याणी कुटुंबाला मोबाईल फोन करून, जेथे आहे तेथेच क्वॉरंटाईन होण्यास सांगितले. मात्र हे कुटुंब सर्वत्र फिरत होते. ३१ डिसेंबर राजी कुटुंब उल्हासनगरला आल्यानंतर, कोरोना आणि ओमायक्रोन रोगाच्या नियम व अटीचा भंग केल्याचा ठपका महापालिका आरोग्य विभागाने ठेवला. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या आदेशानंतर प्रभाग समिती क्रं-३ चे सहायक आयुक अजित गोवारी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी कल्याणी कुटुंबातील दोघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर सुरवातीला रुग्णालयात तर आता घरी उपचार करण्यात येत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या