उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहित वधू लग्नाच्या काही दिवसांनंतरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, वधू फक्त ९ दिवस तिच्या सासरच्या घरी राहिली, नंतर तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आणि तेथून तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.
पती सुनीलने पत्नी बेपत्ता असल्याची पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस तिचा शोध घेत असताना, सोमवारी ती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि सर्वांसमोर म्हणाली - "आता मला फक्त माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं आहे." बिसौली कोतवाली परिसरातील मौसमपूर गावात ही घटना घडली. १७ मे रोजी सुनिलचं लग्न खुशबूशी झालं होतं. पण ९ दिवसांनी ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.
पती सुनीलने दिलेल्या माहितीनुसार, "मी माझ्या पत्नीला नैनितालला हनिमूनसाठी घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता. पण जर तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं असेल तर मी देखील आनंदी आहे. कारण मी राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो, हे चांगले आहे. आता आम्ही तिघेही आनंदी आहोत - मी, माझी पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड. तिला तिचं प्रेम मिळालं आणि माझं आयुष्यही उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं."
या संपूर्ण धक्कादायक प्रकरणावर नवऱ्याची वहिणी राधा हिने पोलीस ठाण्यात सांगितलं की, "आम्ही दिराचं लग्न लावून दिलं होतं. ही मुलगी आमच्या घरी ९ दिवस राहिली, नंतर तिच्या माहेरी गेली. तिथून ती त्याच गावातील तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आम्ही तिला म्हणालो की - आम्ही लग्नात तुला दिलेल्या वस्तू परत कर. तिने वस्तू परत केल्या आहेत आणि आता मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत गेली आहे."