शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:28 IST

नवविवाहित वधू लग्नाच्या काही दिवसांनंतरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहित वधू लग्नाच्या काही दिवसांनंतरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, वधू फक्त ९ दिवस तिच्या सासरच्या घरी राहिली, नंतर तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आणि तेथून तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.

पती सुनीलने पत्नी बेपत्ता असल्याची पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस तिचा शोध घेत असताना, सोमवारी ती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि सर्वांसमोर म्हणाली - "आता मला फक्त माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं आहे." बिसौली कोतवाली परिसरातील मौसमपूर गावात ही घटना घडली. १७ मे रोजी सुनिलचं लग्न खुशबूशी झालं होतं. पण ९ दिवसांनी ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.

पती सुनीलने दिलेल्या माहितीनुसार, "मी माझ्या पत्नीला नैनितालला हनिमूनसाठी घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता. पण जर तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं असेल तर मी देखील आनंदी आहे. कारण मी राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो, हे चांगले आहे. आता आम्ही तिघेही आनंदी आहोत - मी, माझी पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड. तिला तिचं प्रेम मिळालं आणि माझं आयुष्यही उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं." 

या संपूर्ण धक्कादायक प्रकरणावर नवऱ्याची वहिणी राधा हिने पोलीस ठाण्यात सांगितलं की, "आम्ही दिराचं लग्न लावून दिलं होतं. ही मुलगी आमच्या घरी ९ दिवस राहिली, नंतर तिच्या माहेरी गेली. तिथून ती त्याच गावातील तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आम्ही तिला म्हणालो की - आम्ही लग्नात तुला दिलेल्या वस्तू परत कर. तिने वस्तू परत केल्या आहेत आणि आता मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत गेली आहे." 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न