शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

फोनवरच्या भांडणातून प्रेयसीने बिहारमध्ये केली आत्महत्या, तिकडे जयपूरमध्ये प्रियकराने बिल्डींगहून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:39 IST

Bihar Couple Suicide : मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं.

(Image Credit : Aajtak)

बिहारमध्ये (Bihar) बालपणीच्या प्रेमाच गुरूवारी दुःखद अंत (Bihar Couple Suicide) झाला. छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वाद होत असल्याने प्रियकराने मोबाइल फोन स्वीच ऑफ केला म्हणून प्रेयसीने मुजफ्फरपूरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिच्या मृत्यूची बातमी ऐकून प्रियकराने जयपूरमध्ये एका बिल्डींगच्या ८ व्या मजल्याहून उडी मारत जीव दिला.

ही धक्कादायक घटना मुजफ्फरपूरच्य अंजली आणि विवेकसोबत घडली. मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं. दोघेही शाळेत एकत्र शिकत होते. दोघेही आपल्या विश्वात आनंदी होते.

यादरम्यान ४ वर्षाआधी विवेक इंजिनिअरींग करण्यासाठी जयपूरला गेला. त्यामुळे दोघेही फोनवर सतत बोलत होते. अंजील सीएची तयारी करत होती. दोघांमध्ये नेहमीच भांडणही होत होतं. अलिकडे त्यांची भांडणं वाढली होती. बुधवारी रात्रीही एक मैत्रीण त्यांचं नातं ठीक करण्याचा प्रयत्न करत होती.

रात्री तिघांचा कॉन्फरन्स कॉल सुरू होता. तेव्हाच पुन्हा दोघांमध्ये भांडण झालं. रागाच्या भरात विवेकने फोन कट केला. अंजली त्याला पुन्हा पुन्हा फोन लावत होती. त्यामुळे त्यांनी फोन स्वीच ऑफ केला. सकाळी त्याला प्रेयसीच्या मृत्यूची बातमी मिळाली. यानंतर गुरूवारी दुपारी विवेकने बिल्डींगहू उडी घेत आपलाही जीव दिला. 

प्रियकर विवेकच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूनंतर दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्थातच कुटुंबियांना धक्का बसला आहे. विवेकचे काका म्हणाले की, आम्हाला तीन वर्षापासून त्यांच्या नात्याबाबत माहिती होती. अशात हे असं काही घडेल याचा अंदाज नव्हता. त्याने एकदा जरी सांगितलं असतं तर आम्ही अंजलीला आनंदाने सून म्हणून घरात आणलं असतं. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी