शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मुस्कानचं साहिलपेक्षा दुसऱ्या कोणावर तरी होतं जास्त प्रेम; आईने सांगितलं 'ते' सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:13 IST

सौरभची पत्नी मुस्कानने बॉयफ्रेंड साहिलसह सौरभची हत्या केल्याचा आरोप आहे.

मेरठच्या सौरभ हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सौरभची पत्नी मुस्कानने बॉयफ्रेंड साहिलसह सौरभची हत्या केल्याचा आरोप आहे. पण आता आणखी एक नवा खुलासा झाला आहे की, मुस्कानचं साहिल नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीवर खूप प्रेम होतं आणि ती त्या व्यक्तीचा खूप आदर करायची. मुस्कानची आई कविता रस्तोगीने याबाबतचं सत्य सांगितलं आहे. 

आईच्या मते, मुस्कानचं तिच्या मावशीवर सर्वात जास्त प्रेम होतं, जी आता या जगात नाही. आईचा दावा आहे की, मावशीच्या मृत्यूनंतर मुस्कान मानसिकदृष्ट्या खचली होती. ती मावशीला स्वतःची आई मानत असे. म्हणूनच ती माझी आई सावत्र आई आहे असं म्हणायची. सौरभच्या कुटुंबाने या हत्येसाठी मुस्कान आणि तिच्या कुटुंबाला जबाबदार धरलं आहे. 

मुस्कानच्या पालकांनी मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. मुस्कानचे वडील म्हणतात की, त्यांनी एकही पैसे घेतले नाहीत. त्यांच्या मते, जर सौरभने पैसे दिले असते तर ते फक्त बँक खात्यातूनच दिले असते, ज्याची चौकशी केली जाऊ शकते. जुनं घर विकून नवीन घर खरेदी केलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही असंही म्हटलं आहे. 

सौरभ राजपूतची 'ही' छोटीशी चूक ठरली त्याच्या मृत्यूचं कारण; मुस्कानच्या आईचा मोठा खुलासा

मुस्कानच्या आईने या हत्येबाबत धक्कादायक विधान केलं आहे. सौरभची एक छोटीशी चूक त्याच्याच मृत्यूचं कारण बनली असं म्हटलं आहे. मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली की, "आम्ही लग्नापूर्वी कधीही मुस्कानला फोन दिला नाही. पण लग्नानंतर सौरभने स्वतः तिला फोन वापरण्याची परवानगी दिली. सौरभनेच मुस्कानला साहिलशी बोलण्याची परवानगी दिली होती कारण ते दोघेही वर्गमित्र होते. पण ही छोटीशी चूक नंतर त्याच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण बनली." 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस