शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

खाण्या-पिण्याच्या वादातून नदीत बुडवून 'मर्डर', 4 आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 17:43 IST

संजय सुभाषराव मेश्राम (४१), अजय सुभाषराव मेश्राम (३०), गुड्डू ऊर्फ समीर संतोषराव साबळे (३५), शरद गुलाबराव नागपुरे (४०) सर्व रा. धारवाडा ता. तिवसा जिल्हा अमरावती, असे या आरोपींचे नावे आहेत.

ठळक मुद्दे२४ मे २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता मृतक भारत काळे आणि अमोल भीमराव काळे दुचाकीने अजय व रमेश मेश्राम यांचे दारूभट्टीवर  मोटरसायकलने दारू पिण्यासाठी गेले होते.

देउरवाडा/आर्वी (वर्धा) : आर्वी तालुक्यातील सर्कसपूर-टोना शिवारात वर्धा नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा आर्वी पोलिसांनी तपास करून अवघ्या तीन दिवसात चौघांना अटक केली आहे. रविवारी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पोलिसांनी आरोपींना हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायाधीश त्रिवेणी गायगोले यांनी आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भारत रामभाऊ काळे (३७) वर्षे रा. धारवाडा  तालुका तिवसा जिल्हा अमरावती असे मृतकाचे नाव आहे.

संजय सुभाषराव मेश्राम (४१), अजय सुभाषराव मेश्राम (३०), गुड्डू ऊर्फ समीर संतोषराव साबळे (३५), शरद गुलाबराव नागपुरे (४०) सर्व रा. धारवाडा ता. तिवसा जिल्हा अमरावती, असे या आरोपींचे नावे आहेत. आरोपी आणि मृतक एकाच गावाचे आहेत. मृतक हा ट्रॅक्टर चालविण्याचे व पेंटिंगचे काम करीत होता. संजय मेश्राम आणि अजय मेश्राम यांचा दारूचा व्यवसाय असून समीर साबळे व शरद नागपुरे यांचा शेती व्यवसाय आहे. हे या दारू व्यावसायिकाच्या घरी नेहमीच दारू पिण्यासाठी जात होते त्यामुळे त्यांची मैत्री होती. 

२४ मे २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता मृतक भारत काळे आणि अमोल भीमराव काळे दुचाकीने अजय व रमेश मेश्राम यांचे दारूभट्टीवर  मोटरसायकलने दारू पिण्यासाठी गेले होते. दारूचे भट्टीवर खाण्यापिण्यावरु या चौघाशी किरकोळ वाद झाला, वाद मिटवण्यासाठी मृतक हा समजावून सांगत होता. शेवटी साक्षीदार अमोल काळे याने मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता सुमारास पुन्हा  वर्धा नदीच्या पात्रात हे पाच जण फिरण्यासाठी गेले असताना नावेत परत वाद झाल्याने रागाच्या भरात या चौघांनी मृतकास आर्वी तालुक्यातील टोना  गावाचे शिवारात वर्धा नदीच्या पात्रातील पाण्यात बुडून जीवे ठार मारुन रात्री परत घरी गेले. आमचा दोष नसताना मृतक भारत काळे याने आमच्याशी वाद घातला म्हणून त्याला नदीच्या पात्रात बुडवून ठार मारल्याचे या चौघांनी साक्षीदार अमोल काळे याला सांगितले. तसेच, तू कोणाला काही सांगितले, तर तुला पण नदीच्या पाण्यात बुडून ठार मारू अशी धमकी दिल्याने अमोल काळे याने कोणाला काहीही सांगितले नाही.

भारत काळे बेपत्ता असल्याने त्याचे पत्नीने व नातेवाईकांनी शोध घेतला व कुर्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दुर्गवाडा गावातील भोई प्रवीण डाये हा मासे पकडण्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात २ जूनला सर्कसपूर शिवारात गेला असताना त्याला एक पुरुषांचे प्रेत दिसले अशी माहिती मिळाली. त्यानंतर, मृतकाच्या नातेवाईकांनी सर्कसपूर शिवारात वर्धा नदीच्या पात्रात जाऊन पाहिले असता नदीच्या पात्रात काठावर एक कुजलेले प्रेत आढळून आले. त्यामुळे टोना येथील पोलीस पाटील यांनी आर्वी पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने आर्वी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतकाचे प्रेत नातेवाईक व पत्नी यांना दाखवले असता त्यांनी खात्री केली. यावरून सुवर्णा भारत काळे (३२) यांनी आर्वी पोलिसांत तक्रार दिली असून अपराध क्रमांक 0441/ 21 कलम 302, 201, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अतुल भोयर पांडुरंग फुगणार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWardha Riverवर्धा नदी