शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

खाण्या-पिण्याच्या वादातून नदीत बुडवून 'मर्डर', 4 आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 17:43 IST

संजय सुभाषराव मेश्राम (४१), अजय सुभाषराव मेश्राम (३०), गुड्डू ऊर्फ समीर संतोषराव साबळे (३५), शरद गुलाबराव नागपुरे (४०) सर्व रा. धारवाडा ता. तिवसा जिल्हा अमरावती, असे या आरोपींचे नावे आहेत.

ठळक मुद्दे२४ मे २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता मृतक भारत काळे आणि अमोल भीमराव काळे दुचाकीने अजय व रमेश मेश्राम यांचे दारूभट्टीवर  मोटरसायकलने दारू पिण्यासाठी गेले होते.

देउरवाडा/आर्वी (वर्धा) : आर्वी तालुक्यातील सर्कसपूर-टोना शिवारात वर्धा नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा आर्वी पोलिसांनी तपास करून अवघ्या तीन दिवसात चौघांना अटक केली आहे. रविवारी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पोलिसांनी आरोपींना हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायाधीश त्रिवेणी गायगोले यांनी आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. भारत रामभाऊ काळे (३७) वर्षे रा. धारवाडा  तालुका तिवसा जिल्हा अमरावती असे मृतकाचे नाव आहे.

संजय सुभाषराव मेश्राम (४१), अजय सुभाषराव मेश्राम (३०), गुड्डू ऊर्फ समीर संतोषराव साबळे (३५), शरद गुलाबराव नागपुरे (४०) सर्व रा. धारवाडा ता. तिवसा जिल्हा अमरावती, असे या आरोपींचे नावे आहेत. आरोपी आणि मृतक एकाच गावाचे आहेत. मृतक हा ट्रॅक्टर चालविण्याचे व पेंटिंगचे काम करीत होता. संजय मेश्राम आणि अजय मेश्राम यांचा दारूचा व्यवसाय असून समीर साबळे व शरद नागपुरे यांचा शेती व्यवसाय आहे. हे या दारू व्यावसायिकाच्या घरी नेहमीच दारू पिण्यासाठी जात होते त्यामुळे त्यांची मैत्री होती. 

२४ मे २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता मृतक भारत काळे आणि अमोल भीमराव काळे दुचाकीने अजय व रमेश मेश्राम यांचे दारूभट्टीवर  मोटरसायकलने दारू पिण्यासाठी गेले होते. दारूचे भट्टीवर खाण्यापिण्यावरु या चौघाशी किरकोळ वाद झाला, वाद मिटवण्यासाठी मृतक हा समजावून सांगत होता. शेवटी साक्षीदार अमोल काळे याने मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता सुमारास पुन्हा  वर्धा नदीच्या पात्रात हे पाच जण फिरण्यासाठी गेले असताना नावेत परत वाद झाल्याने रागाच्या भरात या चौघांनी मृतकास आर्वी तालुक्यातील टोना  गावाचे शिवारात वर्धा नदीच्या पात्रातील पाण्यात बुडून जीवे ठार मारुन रात्री परत घरी गेले. आमचा दोष नसताना मृतक भारत काळे याने आमच्याशी वाद घातला म्हणून त्याला नदीच्या पात्रात बुडवून ठार मारल्याचे या चौघांनी साक्षीदार अमोल काळे याला सांगितले. तसेच, तू कोणाला काही सांगितले, तर तुला पण नदीच्या पाण्यात बुडून ठार मारू अशी धमकी दिल्याने अमोल काळे याने कोणाला काहीही सांगितले नाही.

भारत काळे बेपत्ता असल्याने त्याचे पत्नीने व नातेवाईकांनी शोध घेतला व कुर्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दुर्गवाडा गावातील भोई प्रवीण डाये हा मासे पकडण्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात २ जूनला सर्कसपूर शिवारात गेला असताना त्याला एक पुरुषांचे प्रेत दिसले अशी माहिती मिळाली. त्यानंतर, मृतकाच्या नातेवाईकांनी सर्कसपूर शिवारात वर्धा नदीच्या पात्रात जाऊन पाहिले असता नदीच्या पात्रात काठावर एक कुजलेले प्रेत आढळून आले. त्यामुळे टोना येथील पोलीस पाटील यांनी आर्वी पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने आर्वी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतकाचे प्रेत नातेवाईक व पत्नी यांना दाखवले असता त्यांनी खात्री केली. यावरून सुवर्णा भारत काळे (३२) यांनी आर्वी पोलिसांत तक्रार दिली असून अपराध क्रमांक 0441/ 21 कलम 302, 201, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अतुल भोयर पांडुरंग फुगणार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWardha Riverवर्धा नदी