शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मुलगी, मुलाची हत्या; मृतदेह लटकवले झाडाला, मुलीच्या वडिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 08:43 IST

गेल्या सहा महिन्यांत जामुई जिल्ह्यात अशाप्रकारे हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. मुलगी व मुलगा एकाच समाजाचे असल्याचे पोलीस म्हणाले.

जामुई : बिहारमधील जामुई जिल्ह्यातील जंगलात मंगळवारी किशोरवयीन मुलगी आणि मुलाचा मृतदेह झाडाला लटकताना आढळला. या दोघांच्या संबंधांना मुलीच्या कुटुंबाची मान्यता नसल्यामुळे त्यांनी या दोघांना ठार मारले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

गेल्या सहा महिन्यांत जामुई जिल्ह्यात अशाप्रकारे हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. मुलगी व मुलगा एकाच समाजाचे असल्याचे पोलीस म्हणाले.

जामुईचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी या हत्याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली तर इतर आरोपी फरार आहेत, असे सांगितले. प्राथमिक चौकशीच्या आधारे मंडल म्हणाले की, या हत्येत मुलीच्या तीन मेहुण्यांचा सहभाग असल्याचे सूचित होते कारण हे तिन्ही मेहुणे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आरोपींनी मुलगी व मुलाला ठार मारण्याचा कट रचला नव्हता, असे सांगून मंडल म्हणाले की,‘मुलीचे वडील व इतरांनी मुलीला मुलासोबत पाहिले आणि तिच्या भांगेत भडक कुंकू पाहिल्यावर त्यांना राग अनावर झाला व हत्या घडली.’ मुलगी व मुलगा लग्न करण्यासाठी मंदिरात गेले होते. काही ग्रामस्थांनीही त्यांना पाहिल्यावर मुलीच्या वडिलांना तसे सांगितले. तिचे वडील व इतर नातेवाईक त्यामुळे संतापले. त्यांनी त्या दोघांना शेतात ओढत नेले व त्यांचा गळा दाबला व मृतदेह झाडाला लटकावले, असे पोलीस म्हणाले.

दोघेही बोर्ड परीक्षा उत्तीर्ण- मुलगी व मुलाने यावर्षी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सोमवारी ते दोघे घरातून बाहेर पडले व नंतर एकाच कपड्याने ते झाडाला लटकताना आढळले. - मुलीची आई म्हणाली की, ती काही कामानिमित्त घरातून बाहेर गेली होती, तर मी मुलाला साखर आणण्यासाठी पाठवले होते, असे मुलाची आजी म्हणाली. या हत्यांनंतर त्या भागात बुधवारी बंद पाळला गेला. सर्व संशयितांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक