शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

महिलेने मुलींना सोबत घेऊन परिवाराला जेवणातून दिलं विष, कारण वाचून डोकं चक्रावून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 3:39 PM

Noida Crime News : पोलिसांनुसार, आई आणि दोन मुलींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ज्याला परिवारातून विरोध होत होता. घरातील लोकांनी त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं होतं.

Noida Crime News : ग्रेटर नोएडामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका सूनेने मुलींसोबत मिळून सासू, सासरा, पती आणि दीराला जेवणातून विष दिलं. मात्र, विषाचा डोज कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. पण जसेही घरातील सर्व सदस्य बेशुद्ध झाले महिला आणि मुली आपापल्या प्रियकरांसोबत फरार झाल्या. घरात कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजारी लोकांना संशय आला आणि त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी लगेच घरातील सर्व सदस्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी फरार महिला आणि तिच्या मुलींना त्यांच्या प्रियकरांसोबत अटक केली.

पोलिसांनुसार, आई आणि दोन मुलींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ज्याला परिवारातून विरोध होत होता. घरातील लोकांनी त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं होतं. त्या आपल्या प्रियकरांसोबत फोनवरही बोलू शकत नव्हत्या. यानंतर तिघींनी मिळून परिवाराच्या हत्येचा प्लान केला, पण विष देताना मुलीचं काळीज पिघळलं. तिने जेवणात कमी विष टाकलं. मुलीला वाटत होतं की, घरातील सदस्यांचा जीव जाऊ नये. विषामुळे महिलेच्या सासूची स्थिती गंभीर झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर घरातील इतर सदस्य घरी परत आले आहेत.

असं सांगितलं जात आहे की, महिलेचे गावातच राहणाऱ्या एका तरूणासोबत अनैतिक संबंध होत. ज्याची माहिती परिवारातील सदस्यांना लागली होती. त्यामुळे घरात नेहमीच वाद होत होता. त्यानंतर महिला घर सोडून गेली होती. बऱ्याच दिवसांनी ती परत आली. यादरम्यान तिच्या दोन मुलींचं गावातील दोन तरूणांसोबत प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. महिलेला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने विरोध केला नाही. यादरम्या महिलाही तिच्या प्रियकरासोबत बोलत होती.

एक दिवस आरोपी महिला राजकुमारी तिचा प्रियकर रवींद्रसोबत फोनवर बोलत होती. ते पती देवेंद्रने ऐकलं. देवेंद्रने पत्नी आणि तिच्या प्रियकराला न बोलण्याची धमकी दिली. त्याने पत्नीचा फोनही फोडला. राजकुमारीला आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन परिवाराला आपल्या मार्गातून हटवायचं होतं.

त्यांनी मिळून प्लान केला आणि यात मुलींचे प्रियकर अभिषेक व दीपकने मुख्य भूमिका निभावली. सर्वांनी मिळून योजना आखली की, परिवाराला विष देऊ त्यांना संपवायचं. पळून जायचं आणि काही दिवसांनी पुन्हा परत यायचं. तेव्हा पूर्ण प्रॉपर्टीवर कब्जा मिळवायचा. 

पोलिसांनी सांगितलं की, जेवणात विष टाकून सर्वांना देण्याची जबाबदारी मुलगी अर्चनाची होती. पण जेवणात विष टाकताना मुलीचं काळीज पिघळलं. तिने कमी विष घातलं. जेवणानंतर रात्री ११ वाजता सर्वांची स्थिती बिघडली आणि सगळे बेशुद्ध झाले.

यानंतर महिला तिच्या मुलींच्या प्रियकरांसोबत फरार झाली. घरात काहीच हालचाल झाली नाही तर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर धक्का बसला. सगळे बेशुद्ध पडले होते. त्यानंतर पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की, महिलेचा प्रियकर या घटनेत सहभागी नव्हता. केवळ मुलींचे प्रियकर यात सहभागी होते. महिलेचं तिच्या प्रियकरासोबत भांडण झालं होतं. ज्यामुळे तिने प्रियकराला हे काही सांगितलं नाही. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी