शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:00 IST

३० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा सांगाडा घराच्या अंगणात सापडला आहे. सांगाडा सापडल्यानंतर गावातील लोकांसह पोलीसही हैराण झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात ३० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा सांगाडा घराच्या अंगणात सापडला आहे. सांगाडा सापडल्यानंतर गावातील लोकांसह पोलीसही हैराण झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी हाथरसच्या गिलौंदपूर गावात एका घरात मानवी सांगाडा सापडला होता. हा सांगाडा १९९४ मध्ये बेपत्ता झालेल्या बुध सिंह यांचा आहे. मुलगा पंजाबी सिंह याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

हाथरसचे जिल्हाधिकारी रोहित पांडे यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीत पंजाबी सिंहने ३० वर्षांपूर्वी आपल्या वडिलांची हत्या झाल्याचा आरोप केला होता. ही हत्या त्याचे दोन मोठे भाऊ आणि त्याच गावातील एक व्यक्ती यांनी केली होती. यानंतर वडिलांचा मृतदेह त्यांच्याच घरात पुरण्यात आला. तक्रार आल्यानंतर डीएमने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. यानंतर गेल्या गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या उपस्थितीत खोदकाम सुरू असताना एक सांगाडा सापडला.

मुरसान पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, पंजाबी सिंहची आई, दोन मोठे भाऊ आणि त्याच गावातील रहिवासी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, बुध सिंह यांच्या मृत्यूवेळी पंजाबी नऊ वर्षांचा होता. उत्खननादरम्यान घरातून सापडलेला सांगाडा पोस्टमार्टम आणि डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचं पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितलं. 

बुध सिंह १९९४ मध्ये त्यांच्या घरातून बेपत्ता झाले आणि ते परत आलेच नाहीत. पंजाबी सिंह यांनी पोलिसांना सांगितलं की, ३० वर्षांपूर्वी जून १९९४ मध्ये वडील आणि मोठ्या भावांमध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. वडिलांच्या बेपत्ता होण्यामागे आपल्या भावांचा हात असल्याचा त्याला संशय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी सिंहला असाही संशय आहे की आपल्या भावांनी वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह घरात पुरला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस