शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Mumbai CST Bridge Collapse : ’त्या’ सहा जणांच्या मृत्यूस संबंधित अधिकारीच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 19:52 IST

आरोपींना होवू शकते १० वर्षापर्यंत शिक्षा, गुन्ह्यात बदल

ठळक मुद्दे६ जणांचा मृत्यूप्रकरणी संबंधिताविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होतात्यांना १० वर्षाची शिक्षा होवू शकते. आरोपींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. हा जामिनपात्र गुन्हा होता. 

मनीषा म्हात्रे

मुंबई -  सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यूप्रकरणी संबंधिताविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होता. आता संबंधित प्रशासन, अधिकारी, ठेकेदारास पोलिसांनी मृत्यूस जबाबदार धरत, गुन्ह्यांत बदल केले आहेत. त्यांच्याविरुद्ध ३०४ अंतर्गत कारवाई होणार आहे. त्यात त्यांना १० वर्षाची शिक्षा होवू शकते. 

अंजुमन इस्लाम कॉलेज येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा दादाभाई नौरोजी मार्गावरील या पादचारी पूलाचा  भाग  कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ६ जणांना प्राण गमवावा लागला, तर ३१ जण जखमी झाले आहेत. घटनेची नोंद करुन तपास करत असलेल्या आझाद मैदान पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा याप्रकरणी पादचारी पूलाची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी जबाबदार संबंधीत यंत्रणा, संस्था आणि त्याच्यासंबंधीत सर्व पदाधिकारी, व्यक्तींविरोधात भादंवी कलम ३०४ (अ), 337 आणि 338 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आरोपींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. हा जामिनपात्र गुन्हा होता. 

मात्र आता, आरोपींवर ३०४ अंतर्गत कारवाई होणार आहे. यातील आरोपीच ६ जणांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार, या गुन्ह्यांत बदल करण्यात आले आहेत. हा अजामिनपात्र गुन्हा असून, यात दोषींना १० वर्षापर्यंत शिक्षा होवू शकते.

तसेच पोलिसांनी पुलाचे स्ट्रक्चर आॅडीट, वर्क आॅर्डर तसेच पुला संबंधित कागदपत्रांवरुन यात कुणाची काय जबाबदारी होती? त्यानुसार, तपास सुरु केला आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य अभियंता संजय दराढे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेत, यातील जखमींचेही जबाब पोलीस नोंदवत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात, लवकरच अटकेची कारवाई होवू शकते असेही पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूलCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाCrime Newsगुन्हेगारी