शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

माणूस की हैवान? 50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत केलं दफन; परिसरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:02 IST

Crime News : गोशाळेतील 50 गायींना जंगलात जिवंत दफन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. 50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत दफन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील नरैनी नगर पंचायत येथील मोतियारी बाजारातील गोशाळेतील 50 गायींना जंगलात जिवंत दफन करण्यात आलं आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करून अधिकाऱ्याचं (EO) निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

नरैनी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार राज करण कबीर यांनी या प्रकरणातील मुख्य दोषींविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करत येथी EO यांचं निलंबन केलं आहे. मुख्य विकास अधिकारी वेद प्रकाश मोर्य यांच्या रिपोर्टनुसार तब्बल 50 गायींना जिवंत दफन करण्याच्या या प्रकरणात इओ प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून आले आहेत. तर दुसरीकडे भाजपा आमदार राज करण कबीर यांनी सांगितलं की, छोट्या अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पहाडी खेरा जंगलात 50 हून अधिक गायींना जिवंत दफन करण्यात आलं होतं. यामध्ये उपजिल्हाधिकारी नरैनीदेखील सामील होते असा आरोप केला आहे. कबीर यांनी मुख्य विकास अधिकारीच्या तपासावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच या घटनेचा तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तर कर्नाटकमध्ये एका शेतकऱ्याने आपल्याच गायीची तक्रार केली आहे. गाय दूध देत नाही म्हणून तो तिलाच घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहाचला. आपली गाय दूध देत नाही आता तुम्हीच तिला थोडं समजवा अशी विनवणी शेतकऱ्याने चक्क पोलिसांना केली. 

'गाय दूध देत नाही आता तुम्हीच तिला थोडं समजवा'; शेतकऱ्याच्या तक्रारीने पोलीसही झाले हैराण

शेतकऱ्याची अशी तक्रार ऐकून पोलीस अधिकारीही हैराण झाले. कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात ही अजब घटना घडली आहे. सिदलीपूर गावातील शेतकरी रमैया याने होलेहोन्नूर पोलीस ठाण्यात ही अनोखी तक्रार दिली आहे. चारा खायला घातल्यानंतरही आपली गाय दूध देत नाही आहे, असं त्याने पोलिसांना सांगितलं. खरंतर पाळीव प्राण्यांसंबंधी कोणतीही समस्या असेल तर त्यांना प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेलं जातं. पण या शेतकऱ्याने गाय दूध देत नाही म्हणून तिला घेऊन थेट पोलीस स्टेशनच गाठलं आहे. शेतकऱ्याच्या या कृतीने ग्रामस्थांनी ही धक्का बसला आहे.  

टॅग्स :cowगायUttar Pradeshउत्तर प्रदेश