शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून मोहनमाळ लांबविली; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 21:56 IST

या प्रकरणी चोरट्यांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जालना : धाराशिव येथून लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन लाख ५० हजार रूपये किंमतीची मोहन माळ चोरून नेल्याची घटना परतूर येथील गजानन मंगल कार्यालयाच्या गेटवर शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील तांबरी येथील सुनिल पाटील यांच्या पुतण्याचे परतूर येथील गजानन मंगल कार्यालयात शुक्रवारी लग्न होते. यासाठी सुनिल पाटील, त्यांची भावजई उज्वला पाटील, आशा पाटील, आकाश पाटील, आदित्य पाटील हे शुक्रवारी आले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास गजानन मंगल कार्यालयाच्या गेटवर उभा असतांना, दुचाकीवरून दोन अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी उज्वला पाटील यांच्या गळ्यातील २ लाख ५० हजार रूपये किंमतीची पाच तोळ्याची मोहन माळ हिसकावून नेली. त्यानंतर महिलांनी आरडाओरड केली. परंतु, चोरटे फरार झाले. याची माहिती परतूर पोलिसांना देण्यात आली. 

परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी सुनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalanaजालना