शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

मीरा भाईंदर - वसई विरारमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी ६६५ जणांवर कारवाई

By धीरज परब | Updated: October 13, 2022 20:14 IST

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कारवाईत मोठी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमलीपदार्थांची विक्री व अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ६६५ जणांवर पोलिसांनी गेल्या ९ महिन्यात अटकेची कारवाई केली आहे. गेल्या वर्षी पेक्षा कारवाईत मोठी वाढ झाली आहे.

अंमली पदार्थांची तस्करी , विक्री व सेवन रोखण्यासाठी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी हद्दीतील १६ पोलीस ठाण्यांच्या प्रभारींसह गुन्हे शाखा , अमली पदार्थ विरोधी शाखांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत . या शिवाय नागरिकांनी देखील अश्या प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे .  पोलीस आयुक्तालयाच्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली . पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन,  सीमाशुल्क विभाग, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग सहभागी झाले होते.

२०२१ मध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या १०५  तस्कर विक्रत्यांवर तर सेवन करणाऱ्या ४०८ जणांवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली होती .  तर १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या ९ महिन्यांच्या काळात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ११७ व त्याचे सेवन करणाऱ्या ५४८ जणांना पकडण्यात आले . २०२१ च्या तुलनेत २०२२ ह्या चालू वर्षात पोलिसांनी अमली पदार्था विरोधातील कारवाई तीव्र केली असल्याचे आकडेवारी सांगते . तर अमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यासह गस्त वाढवणे , त्यांच्या जागा हुडकून काढणे तसेच तस्करी करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदरVasai Virarवसई विरार