शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पार्लरमधून मेकअप करुन बाहेर पडलेल्या नवऱ्यांवर फेकला चिखल; पाहुण्यांनाही मारहाण, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:43 IST

लग्नासाठी ब्युटी पार्लरमधून लग्नस्थळी परतत असलेल्या दोन नवरींना कारमधून बाहेर काढलं आणि मारहाण केली.

उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये एका गावात क्षुल्लक कारणावरून समाजकंटकांनी २ तास गोंधळ घातला. लग्नासाठी ब्युटी पार्लरमधून लग्नस्थळी परतत असलेल्या दोन नवरींना कारमधून बाहेर काढलं आणि मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर चिखल फेकला. एवढ्यावरच ते थांबवे नाही. ते लग्नात आले आणि पाहुण्यांना मारहाण केली. वाहनांचं नुकसान केलं. 

नवरदेवाच्या वडिलांना काठीने मारून त्यांचं डोकं फोडलं. हा सगळा वाद त्यांच्या बाईकला रस्ता न दिल्यामुळे झाला. या घटनेमुळे लग्न मोडलं. सध्या गावात तणाव आहे. नवरीच्या वडिलांनी १५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तरुणांवर छेडछाड आणि दागिने लुटल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेनंतर, गुंड गावातून पळून गेले. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तसेच दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी रिफायनरी पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात दोन बहिणींचं लग्न होतं. राजस्थानातील डिंग जिल्ह्यातून लग्नाची वरात आली होती. मुलींचे काका टाउनशिपमधील एका ब्युटी पार्लरमधून दोन्ही वधूंना त्यांच्या गाडीतून घेऊन येत होते. रात्री ८ वाजता गावातील रस्त्यावरून जात असताना त्यांचा दोन तरुणांशी वाद झाला. यानंतर तरुणांनी काकांना गाडीतून बाहेर काढलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. नवऱ्या त्यांना वाचवण्यासाठी गाडीतून उतरल्या तेव्हा त्यांनाही मारहाण केली आणि त्यांच्यावर चिखल फेकला.

काही तरुण लग्न असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना मारहाण करू लागले. वाहनांचं नुकसान केलं आणि नवरदेवाच्या वडिलांच्या डोक्यावर काठीने वार केले ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. वाद पाहून मुलाच्या कुटुंबीयांनी संबंध तोडले आणि लग्न मोडले. लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं. माहिती मिळताच, रात्री पोलीस पोहोचले. गावात तणाव असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

मुलींच्या वडिलांनी लोकेश, सतीश, शिशुपाल, रोहतास, श्रीपाल उदल, ब्रिजेश, शुभम, पवन, अनिल, अमित आणि गावातील यादव समाजातील अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल केली आणि पाच जणांना ताब्यात घेतलं. याच दरम्यान, एसपी शैलेश कुमार पांडे यांनी सांगितलं की, मुख्य आरोपी रोहतास यादव आणि एकाला अटक करण्यात आली आहे. लवकरच इतर लोकांनाही अटक केली जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न