शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! लग्नापूर्वी दोन कुटुंबात झाली, हाणामारीत एकाच मृत्यू तर 5 जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 16:10 IST

Assaulting : आठ फरार, आराेपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी    

ठळक मुद्देपोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे कार्यवाही सुरु  असताना नवऱ्याचा भाऊ विठू जनार्दन तुपट (33) याला त्रास जाणवू लागला.

निखील म्हात्रे

अलिबाग : तालुक्यातील पेझारी येथे झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (11 ऑक्टोबर) रोजी घडली. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून आणखी आठ जणांचा शोध सुरु  आहे. लग्नापूर्वीच दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन यामध्ये नवऱ्याच्या मोठ्या भावाला जीव गमवावा लागला.आज या अटकेतील पाच जणांना अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

पेझारी येथील एका मुलीचे लग्न बदलापूर येथील मुलासोबत ठरले होते. या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र साखरपुड्याच्या कार्यक्र मात मुलीकडील फोटोग्राफरने मुलाच्या लहान बिहणीचा नंबर मागितला. तसेच ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब मुलाच्या घरच्यांना आवडली नाही. यावरु न दोन कुटुंबात वाद सुरु  झाले. मुलाच्या घरच्यांनी त्या फोटोग्राफरला माफी मागायला सांगा, असे मुलीकडच्या मंडळींना सांगितले. तसेच माफी मागितली नाही तर लग्न करणार नाही, असेही कळवले. मात्र याकरिता मुलीच्या घरचे तयार नव्हते. या विषयावरु न रविवारी पेझारी येथील साई वाटीका हॉटेलजवळ दोन्ही कुटुंबांनी बैठक बोलावली.  वाद चिघळत जाऊ  नये म्हणून प्रत्यक्ष भेटून विषय संपवून टाकू, असे सांगितले. त्यानुसार नवरा मुलगा, त्याचे तीन भाऊ आणि गाडी चालक असे पाच जण रविवारी पेझारीला आले. पेझारी येथील साई वाटीका हॉटेलजवळ दोन्ही पक्षाच्या लोकांमध्ये बोलणी सुरु  झाली. आवाज वाढू लागले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलबाहेर जोरदार बाचाबाची सुरु  झाली. ते पाच आणि हे दहा ते बारा जण. त्यांनी नवरा मुलगा आणि त्याच्या भावाला मारहाण करण्यास सुरु वात केली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळीपोहचले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे कार्यवाही सुरु  असताना नवऱ्याचा भाऊ विठू जनार्दन तुपट (33) याला त्रास जाणवू लागला. पोलिसांनी त्यांना मेडीकल करण्यास सांगितले. त्यानुसार तुपट आणि अन्य पोयनाड येथील आरोग्य केंद्रात गेले. मात्र त्यांच्याकडे पोलिसांचे पत्र नसल्याने त्यांना दाखल करु न घेतले नाही. त्यामुळे अलिबाग जिल्हा रु ग्णालयात दाखल होण्यास सांगितले. रु ग्णालयात उपचार सुरुअसतानाच विठू तुपट याचा मृत्यू झाला. विठू याच्यामागे दोन लहान मुली आहेत. एका किरकोळ वादातून एक जीव तर गेलाच; परंतु दोन लहानग्यांचे वडील ही गमावले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी हत्येसह मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर फरार असलेल्या आठ जणांचा शोध सुरु असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनीदिली. अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Policeपोलिसalibaugअलिबागmarriageलग्नDeathमृत्यू