शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

बोहल्यावर चढण्याआधीच काळाने घातला घाला, हळदीच्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 21:36 IST

आज हळद, सोमवारी होते लग्न : भिलोना गावात शोककळा

परतवाडा (अमरावती)  : अचलपूर तालुक्यातील भिलोना येथील २९ वर्षीय युवकाचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदयाघाताने मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. सागर अण्णा साबळे असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.  

या युवकाचा सोमवारी अमरावती येथे विवाह होणार होता. रविवारला त्याला हळद लागणार होती. ठाणे येथे एसटी महामंडळात तो चालकपदावर कार्यरत होता. मागील वर्षीच त्याला ही नोकरी लागली. त्याला आई-वडील नाहीत. घरात तो एकटाच होता. आपल्या विवाहित बहिणीच्या मदतीने तो स्वत:च्या लग्नाची तयारी करीत होता. धावत होता. त्याने अमरावतीला जाऊन खरेदीही केली. लॉकडाऊनपासून तो गावातच मुक्कामी असून बाहेरगावाहून आल्यामुळे त्याने त्यादरम्यान स्वत:ला चौदा दिवस होमक्वारंटाईन करून घेतले होते.

काही दिवसांपूर्वीच त्याचे साक्षगंधही झाले होते. शुक्रवारी सकाळी त्याच्या छातीत दुखायला लागले म्हणून मित्रांसमवेत तो परतवाड्यात डॉक्टरकडे आला. दरम्यान त्याचे छातीचे दुखणे थांबले. डॉक्टरांनी अ‍ॅडमिट करून घेतले, तर आपले लग्न राहून जाईल म्हणून तो आपल्या मित्रांसमवेत परत गावात आला. पण, शनिवारी सकाळी त्याच्या छातीत परत दुखायला लागले. मित्रांनी वाहनात टाकून परतवाड्यात आणले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

मित्रांनी त्याचा मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात नेला. तेथे त्याचे शवविच्छेदन केल्या गेले. शनिवारला सायंकाळी ७.३० वाजताचे दरम्यान भिलोना येथील चंद्रभागा नदीच्या तिरी त्याचे पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने सर्व गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाmarriageलग्नAmravatiअमरावतीDeathमृत्यू