शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

मनसुख हिरेन हत्येप्रकरण; सचिन वाझे यांच्याविराेधात एटीएस लवकरच दाखल करणार गुन्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 05:05 IST

जमीर काझी  मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा संबंध असल्याच्या ...

जमीर काझी मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा संबंध असल्याच्या निष्कर्षापर्यंत दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) पोहचले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते. वाझे यांच्याकडील तपासाचा अहवाल पोलीस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविला असून त्यांच्या संमतीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. (Mansukh Hiren murder case; ATS to file case against Sachin Waze soon?)हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसने तीन दिवसांपूर्वी वाझे यांची तब्बल १० तास चौकशी केली. त्यात काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी असमाधानकारक दिली. त्यामुळे ते काहीतरी माहिती लपवित असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याच अनुषंगाने १९ मार्चला ठाणे सत्र न्यायालयात होणाऱ्या त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २५ फेब्रुवारीला पेडर रोडवर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाहून ५०० मीटर अंतरावर २० जिलेटीनच्या कांड्या व धमकीचे पत्र सापडलेल्या स्काॅर्पिओचे मालक हिरेन यांचा ५ मार्चला रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळला. याप्रकरणात वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

वाझे -हिरेन पूर्वीपासून संपर्कात व्यापारी मनसुख हिरेन हे पोलिसांचे खबरे म्हणूनही ओळखले जात होते. वाझे यांच्याशी त्यांची खास मैत्री असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांची गाडी वापरणे, तसेच हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या विविध आरोपांबाबत वाझे यांना समाधानकारक खुलासा करता आलेला नाही. त्यामुळे ते कारवाईच्या कचाट्यात सापडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...तर एनआयएकडून कारवाई अटळ स्काॅर्पिओत जिलेटीन कांड्या सापडल्याच्या कारणावरून राज्य व केंद्र सरकारमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. केंद्राने त्याबद्दलचा तपास एनआरएकडे सोपविला आहे. हिरेन यांच्या हत्येबाबत वाझेंविरुद्ध सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एटीएसने कारवाई न केल्यास एनआयए त्यांच्यावर कारवाई करेल, असे निश्चित मानले जात आहे.

जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ! -

मनसुख हिरेन  यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एपीआय सचिन वाझे यांनी आपल्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर  केलेली भावनिक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.  आपल्याला काही सहकाऱ्यांकडून  अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे. त्यामुळे ते प्रचंड निराशेत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी  नकारात्मक विचार सोडावा आणि हे स्टेटस हटवावे, अशी सूचना पोलीस आयुक्त परमबीर  सिंग व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून विधिमंडळ अधिवेशनात  विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. वाझे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली. त्यामुळे होणाऱ्या टीकेमुळे  आपल्यावरील आरोपाला त्यांनी व्हाॅट्सॲप स्टेटसवरून उत्तर दिले. त्यात म्हटले आहे की, ‘३ मार्च २००४ रोजी सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे. मला पुन्हा  खोट्या आरोपांखाली अडकविण्यात येण्याची शक्यता आहे’,  असे वाझे यांनी पाेस्टमध्ये म्हटले आहे.‘सध्याच्या परिस्थितीत थोडा बदल आहे. आधी हे घडले तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होते. आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्षे शिल्लक होती. मात्र, आता माझ्याकडे  नोकरीची आणि आयुष्याचीही  १७ वर्षे शिल्लक नाहीत तसेच अशा पद्धतीने जगण्याचे धैर्यही नाही. मला वाटते जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे.’  असे वाझे यांनी पाेस्टमध्ये नमूद केले आहे. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी