शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

तिसऱ्यांदा लग्न करणार होता, संतापलेल्या दोन बायका पोहोचल्या एसपी कार्यालयात, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:21 IST

याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती तिसऱ्यांदा लग्न करणार होता. यासाठी त्याने आपल्या पहिल्या दोन पत्नींना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चिल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोनदा लग्न केल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाल्याचा आरोप दोन महिलांनी केला आहे. यानंतर पतीने त्यांचा मानसिक छळ सुरू केला आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तो तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. आरोपी व्यक्तीने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून २०२२ मध्ये बिहारमध्ये दुसरे लग्न केले. यानंतर सुमारे दीड वर्षानंतर आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला तिच्या घरात आसरा दिला. आता दोघीही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

पती मुझफ्फरनगरमध्ये तिसरे लग्न करणार असल्याचे दोन्ही पत्नींना समजल्यानंतर त्यांनी तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर दोन्ही पत्नींनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची याचना केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्टेशन प्रभारींना दिले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले पोलीस अधीक्षक?दरम्यान, पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, चिल्ला पोलिस स्टेशन परिसरातील दोन महिलांनी चिल्ला पोलिस ठाण्यात आरोपी दीपकने फसवणूक केली असून दोनदा लग्न केल्याचे तक्रार पत्र दिले. आरोपीने दोन्ही पत्नींना ओलीस ठेवले आणि मारहाण करून शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी चिल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी