शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

तिसऱ्यांदा लग्न करणार होता, संतापलेल्या दोन बायका पोहोचल्या एसपी कार्यालयात, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:21 IST

याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती तिसऱ्यांदा लग्न करणार होता. यासाठी त्याने आपल्या पहिल्या दोन पत्नींना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चिल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोनदा लग्न केल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाल्याचा आरोप दोन महिलांनी केला आहे. यानंतर पतीने त्यांचा मानसिक छळ सुरू केला आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तो तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. आरोपी व्यक्तीने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून २०२२ मध्ये बिहारमध्ये दुसरे लग्न केले. यानंतर सुमारे दीड वर्षानंतर आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला तिच्या घरात आसरा दिला. आता दोघीही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

पती मुझफ्फरनगरमध्ये तिसरे लग्न करणार असल्याचे दोन्ही पत्नींना समजल्यानंतर त्यांनी तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर दोन्ही पत्नींनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची याचना केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्टेशन प्रभारींना दिले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले पोलीस अधीक्षक?दरम्यान, पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, चिल्ला पोलिस स्टेशन परिसरातील दोन महिलांनी चिल्ला पोलिस ठाण्यात आरोपी दीपकने फसवणूक केली असून दोनदा लग्न केल्याचे तक्रार पत्र दिले. आरोपीने दोन्ही पत्नींना ओलीस ठेवले आणि मारहाण करून शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी चिल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी