शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

तिसऱ्यांदा लग्न करणार होता, संतापलेल्या दोन बायका पोहोचल्या एसपी कार्यालयात, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:21 IST

याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती तिसऱ्यांदा लग्न करणार होता. यासाठी त्याने आपल्या पहिल्या दोन पत्नींना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चिल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोनदा लग्न केल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाल्याचा आरोप दोन महिलांनी केला आहे. यानंतर पतीने त्यांचा मानसिक छळ सुरू केला आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तो तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. आरोपी व्यक्तीने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून २०२२ मध्ये बिहारमध्ये दुसरे लग्न केले. यानंतर सुमारे दीड वर्षानंतर आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला तिच्या घरात आसरा दिला. आता दोघीही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

पती मुझफ्फरनगरमध्ये तिसरे लग्न करणार असल्याचे दोन्ही पत्नींना समजल्यानंतर त्यांनी तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर दोन्ही पत्नींनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची याचना केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्टेशन प्रभारींना दिले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले पोलीस अधीक्षक?दरम्यान, पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, चिल्ला पोलिस स्टेशन परिसरातील दोन महिलांनी चिल्ला पोलिस ठाण्यात आरोपी दीपकने फसवणूक केली असून दोनदा लग्न केल्याचे तक्रार पत्र दिले. आरोपीने दोन्ही पत्नींना ओलीस ठेवले आणि मारहाण करून शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी चिल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी