शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्यांदा लग्न करणार होता, संतापलेल्या दोन बायका पोहोचल्या एसपी कार्यालयात, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:21 IST

याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती तिसऱ्यांदा लग्न करणार होता. यासाठी त्याने आपल्या पहिल्या दोन पत्नींना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चिल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोनदा लग्न केल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाल्याचा आरोप दोन महिलांनी केला आहे. यानंतर पतीने त्यांचा मानसिक छळ सुरू केला आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तो तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. आरोपी व्यक्तीने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून २०२२ मध्ये बिहारमध्ये दुसरे लग्न केले. यानंतर सुमारे दीड वर्षानंतर आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला तिच्या घरात आसरा दिला. आता दोघीही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

पती मुझफ्फरनगरमध्ये तिसरे लग्न करणार असल्याचे दोन्ही पत्नींना समजल्यानंतर त्यांनी तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर दोन्ही पत्नींनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची याचना केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्टेशन प्रभारींना दिले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले पोलीस अधीक्षक?दरम्यान, पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, चिल्ला पोलिस स्टेशन परिसरातील दोन महिलांनी चिल्ला पोलिस ठाण्यात आरोपी दीपकने फसवणूक केली असून दोनदा लग्न केल्याचे तक्रार पत्र दिले. आरोपीने दोन्ही पत्नींना ओलीस ठेवले आणि मारहाण करून शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी चिल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी