शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

'अनैतिक संबंधा'च्या संशयावरून एकाला जमिनीत ४०० फूट खाली गाडलं, आता मिळाली जन्मठेपेची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 12:53 IST

टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित वृत्तानुसार, देवांग बिझनेसच्या कामासाठी मांडवीच्या नाना भालिया गावातील दोषी रामच्या घरी अनेकदा जात-येत होता.

गुजरातच्या भूजमध्ये गुरूवारी कोर्टाने १९ वर्षीय एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तिघांपैकी एका दोषीला संशय होता की, मृत व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. ज्यानंतर दोषीने आपल्या २ साथीदारांसोबत मिळून पीडित व्यक्तीची कुऱ्हाडीने तुकडे करून हत्या केली.

टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित वृत्तानुसार, देवांग बिझनेसच्या कामासाठी मांडवीच्या नाना भालिया गावातील दोषी रामच्या घरी अनेकदा जात-येत होता. नंतर काही दिवसांनी रामला संशय आला की, देवांग आणि त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध आहे. यानंतर दोषी खेमराज आणि नारानने देवांगला रामच्या पत्नीला न भेटण्याची धमकीही दिली. पण देवांगने काही ऐकलं नाही. त्यानंतर रामने त्याच्या साथीदारांसोबत मिळून देवांगची हत्या करण्याचा निर्णय घेतला. (हे पण वाचा : मुलीला बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, संतापलेल्या सावत्र पित्याने असे काही केले)

तिन्ही दोषींनी देवांगला मारण्याचा प्लॅन केला. त्यांच्या प्लॅननुसार, १२ फेब्रुवारी २०१८ ला देवांगला शेतात भेटण्यासाठी बोलवलं. त्यानंतर देवांग आपल्या आई-वडिलांना सांगून बाहेर पडला. तो म्हणाला की, काही कामानिमित्त बाहेर जात आहे. तो उद्या सकाळी परत येईल.

काय झालं त्या दिवशी?

जेव्हा देवांग शेतात पोहोचला तेव्हा राम त्याला तलावाकडे घेऊन गेला. तिथे खेमराज आणि नारान त्याची वाट बघत होते. तिथे पोहोचल्यावर रामने देवांगला जमिनीववर पाडले आणि तिघांनी त्याला दोराने बांधले. त्यानंतर तिघांनी देवांगला निर्दयीपणे जीवे मारले. त्यानंतर तिघांनी त्याचा मृतदेह फेकण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा : खळबळजनक! अपहरण करत त्याने तरुणीची डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या)

दोषींनी देवांगचा मृतदेह बोअरवेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण बोअरवेलचं तोंड लहान असल्याने त्यात तो त्याला टाकता येऊ शकत नव्हतं. त्यानंतर ते शेजारच्या शेतातून कुर्हाड घेऊन आले आणि देवांगचे पाच तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये टाकले.

जेव्हा दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारी २०१८ ला देवांग आपल्या घरी परतला नाही तर त्याच्या वडिलांनी गांडवीमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली. नंतर पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्सच्या आधारावर राम, खेमराज आणि नारन यांना अटक केली. चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. तसेच मृतदेह कुठे लपवला हेही सांगितले. ४०० फूट खोल बोअरवेलमधून देवांगचा मृतदेह काढण्यासाठी ६ दिवस लागले होते. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी