शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Arnab Goswami: अर्णब गोस्वामींवर हक्कभंग कारवाई? प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावावर चर्चा

By हेमंत बावकर | Updated: November 5, 2020 19:48 IST

Arnab Goswami Arrest : अर्णब यांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.

अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी तुरुंगात आहेत. उच्च न्यायालयानेही जामीन न दिल्याने आज दुसऱ्य़ा दिवशीही गोस्वामी यांना अलिबागच्या मराठी शाळेत रहावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनीही महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविलेला असताना आता आणखी अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समितीची गुरुवारी बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये अर्णब गोस्वामींच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. यासाठी 16 सप्टेंबरला महाराष्ट्र विधानसभेत अर्णब गोस्वामीविरोधात हक्कभंग प्रस्ताव देण्यात आला होता. अशाच प्रकराचा आणखी प्रस्ताव आमदार मनिषा कायंडे यांनी विधान परिषदेतही दिला होता. 

या प्रस्तावांवर आज चर्चा करण्यात आली. हक्कभंग प्रस्तावावर समितीने गोस्वामी यांना चारवेळा हजर राहण्याची नोटीस पाठविल्या आहेत. मात्र, ते समितीसमोर हजर झाले नाहीत. शेवटची नोटीस 16 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी अर्णबला देण्यात आली होती. त्यांना दुपारी ३ वाजता केवळ 10 मिनिटे विधानसभेत हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी महाराष्ट्र सचिवालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये अर्णबला 16 सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. 

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर 'आणीबाणी 2.0' असा उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. आणीबाणी 2.0 मध्ये तुमचं स्वागत आहे, असा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.

अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबईउच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. फिर्यादी आज्ञा नाईक, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना न्यायालयाने बजावली नोटीस. उद्या दुपारी ३ वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी अर्णव गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच असं म्हणावं लागेल. 

अर्णब यांना अंतरिम दिलासा नाही

अर्णब यांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी म्हणून सेशन कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे अखेर अर्णब यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे उद्या दुपारी अर्णब यांच्या जामिनावर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडे सर्वाचं लक्ष आहे. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसpratap sarnaikप्रताप सरनाईक