शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:40 IST

Woman dies after falling under locol train : डोंबिवली पश्चिमेकडिल भोईर चाळीत ज्ञानेश्वर पाटील व विद्या पाटील हे दाम्पत्य सहा महिन्यांची चिमुकली परी ,6 वर्षांची मेधा ,9 वर्षाची पूर्वा या आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह राहत होते.

ठळक मुद्देएकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो असा सवाल उपस्थित झाला आहे.

डोंबिवली - लॉकडाऊन काळात एकीकडे चोरीच्या घटना वाढल्या असताना कळवा रेल्वे स्थानकातही एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत एका महिला प्रवाशाचा लोकलखाली येऊन  दुर्देवी मृत्यू झाला आहे. विद्या पाटील अस या महिलेचं नाव असून ती डोंबिवली कुंभारखान पाडा येथे राहणा-या आहेत. विद्या यांच्या  मृत्यूमुळे त्यांच्या तीन मुलींवरील मायेचं छत्रही हरवलं आहे. यामध्ये 6 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत फजिल शेख या सराईत चोरट्याला अटक केली आहे. मात्र, एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो असा सवाल उपस्थित झाला आहे.       

शनिवारी सायंकाळी विद्या नेहमी प्रमाणे अंधेरी येथून  लोकलने घरी परतत होत्या. लोकल संध्याकाळी 8च्या सुमारास कळवा स्थानकात पोहचली . कळवा स्थानकातून लोकल मार्गस्थ होताच एका चोरट्याने महिलांच्या डब्यात प्रवेश करत उभ्या असलेल्या विद्या यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. चोरट्याच्या मागे विद्या यांनी देखील चालत्या लोकलमधून उडी मारून चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र झटापटीत त्या लोकल खाली फेकल्या गेल्या त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती इतर प्रवासी महिलांनी रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर अज्ञात चोरट्या विरोधात महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करत फ़ैजल शेख याला अटक केली आहे . दरम्यान या दुर्घटनेनंतर विद्याच्या नातेवाईकांनी या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

      

डोंबिवली पश्चिमेकडिल भोईर चाळीत ज्ञानेश्वर पाटील व विद्या पाटील हे दाम्पत्य सहा महिन्यांची चिमुकली परी ,6 वर्षांची मेधा ,9 वर्षाची पूर्वा या आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह राहत होते . ज्ञानेश्वर हे इलेक्ट्रिशन असून विद्या या एका खाजगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. विद्या यांच्या अचानकपणे जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटने नंतर रेल्वे पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो. लॉकडाऊन मध्ये देखील रेल्वे पुलावर गर्दुल्याचा वावर कसा काय असू शकतो रेल्वे पोलिसाकडून त्यांच्या बाबतीत बघ्याची भूमिका का घेतली जाते. नियम केवळ सर्वसामान्य गरिबासाठीच आहेत का? असे अनेक सवाल उपस्थित होत  आहेत . 

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यागोदारही अनेक गुन्हे दाखल आहेत. आमच्यावर जी वेळ आली तशी वेळ कोणावरही येऊ नये. विद्याचा फोन त्या दिवशी बराच वेळ लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मला कळवा स्थानकात बोलावून घेतले तेव्हाच माझ्या मनात भीती निर्माण झाली. फलाटावर देखील  रेल्वे पोलिस कर्मचारी तैनात असावेत. - ज्ञानेश्वर पाटील, मयत  विद्याचे पती 

 

जेव्हा सामान्य माणसाला रेल्वे स्थानकात प्रवेश करताना त्याची चौकशी केली जाते? मग चोरटे गर्दुल्ले रेल्वे स्थानकात कसे काय प्रवेश करतात? हा प्रश्न आहे. या संदर्भात  रेल्वे प्रशासनाची  आम्ही तक्रार केली आहे. - कमलाकर पाटील, मयत विद्या यांचे नातेवाईक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलPoliceपोलिसRobberyचोरीDeathमृत्यूdombivaliडोंबिवली