शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:40 IST

Woman dies after falling under locol train : डोंबिवली पश्चिमेकडिल भोईर चाळीत ज्ञानेश्वर पाटील व विद्या पाटील हे दाम्पत्य सहा महिन्यांची चिमुकली परी ,6 वर्षांची मेधा ,9 वर्षाची पूर्वा या आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह राहत होते.

ठळक मुद्देएकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो असा सवाल उपस्थित झाला आहे.

डोंबिवली - लॉकडाऊन काळात एकीकडे चोरीच्या घटना वाढल्या असताना कळवा रेल्वे स्थानकातही एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत एका महिला प्रवाशाचा लोकलखाली येऊन  दुर्देवी मृत्यू झाला आहे. विद्या पाटील अस या महिलेचं नाव असून ती डोंबिवली कुंभारखान पाडा येथे राहणा-या आहेत. विद्या यांच्या  मृत्यूमुळे त्यांच्या तीन मुलींवरील मायेचं छत्रही हरवलं आहे. यामध्ये 6 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत फजिल शेख या सराईत चोरट्याला अटक केली आहे. मात्र, एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो असा सवाल उपस्थित झाला आहे.       

शनिवारी सायंकाळी विद्या नेहमी प्रमाणे अंधेरी येथून  लोकलने घरी परतत होत्या. लोकल संध्याकाळी 8च्या सुमारास कळवा स्थानकात पोहचली . कळवा स्थानकातून लोकल मार्गस्थ होताच एका चोरट्याने महिलांच्या डब्यात प्रवेश करत उभ्या असलेल्या विद्या यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. चोरट्याच्या मागे विद्या यांनी देखील चालत्या लोकलमधून उडी मारून चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र झटापटीत त्या लोकल खाली फेकल्या गेल्या त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती इतर प्रवासी महिलांनी रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर अज्ञात चोरट्या विरोधात महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करत फ़ैजल शेख याला अटक केली आहे . दरम्यान या दुर्घटनेनंतर विद्याच्या नातेवाईकांनी या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

      

डोंबिवली पश्चिमेकडिल भोईर चाळीत ज्ञानेश्वर पाटील व विद्या पाटील हे दाम्पत्य सहा महिन्यांची चिमुकली परी ,6 वर्षांची मेधा ,9 वर्षाची पूर्वा या आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह राहत होते . ज्ञानेश्वर हे इलेक्ट्रिशन असून विद्या या एका खाजगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. विद्या यांच्या अचानकपणे जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटने नंतर रेल्वे पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नसताना चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ल्याना मात्र रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो. लॉकडाऊन मध्ये देखील रेल्वे पुलावर गर्दुल्याचा वावर कसा काय असू शकतो रेल्वे पोलिसाकडून त्यांच्या बाबतीत बघ्याची भूमिका का घेतली जाते. नियम केवळ सर्वसामान्य गरिबासाठीच आहेत का? असे अनेक सवाल उपस्थित होत  आहेत . 

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यागोदारही अनेक गुन्हे दाखल आहेत. आमच्यावर जी वेळ आली तशी वेळ कोणावरही येऊ नये. विद्याचा फोन त्या दिवशी बराच वेळ लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मला कळवा स्थानकात बोलावून घेतले तेव्हाच माझ्या मनात भीती निर्माण झाली. फलाटावर देखील  रेल्वे पोलिस कर्मचारी तैनात असावेत. - ज्ञानेश्वर पाटील, मयत  विद्याचे पती 

 

जेव्हा सामान्य माणसाला रेल्वे स्थानकात प्रवेश करताना त्याची चौकशी केली जाते? मग चोरटे गर्दुल्ले रेल्वे स्थानकात कसे काय प्रवेश करतात? हा प्रश्न आहे. या संदर्भात  रेल्वे प्रशासनाची  आम्ही तक्रार केली आहे. - कमलाकर पाटील, मयत विद्या यांचे नातेवाईक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलPoliceपोलिसRobberyचोरीDeathमृत्यूdombivaliडोंबिवली