शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नवरीने पहिल्या रात्रीनंतर दिला असा 'दणका', नवरदेवाला बसला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 12:27 IST

Crime News : तुमच्या घरात आलेली नवरी 'लुटेरी दुल्हन' आहे आणि नवरदेवाच्या घरातील सगळं काही ती लुटून घेऊन गेली तर? अर्थातच मुलाकडील लोकांना धक्का बसेल. अशीच एक घटना समोर आली आहे.

Crime News : भारतात लग्न म्हटलं एखाद्या सणासारखंच वातावरण असतं. अनेक दिवस वेगवेगळे रिती-रिवाज सुरू असतात. होणारे नवरी-नवरदेव नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतात. एकंदर काय तर आनंदाच वातावरण असतं. कोणत्याही तरूण-तरूणीला लग्नानंतर त्यांच्या मधुचंद्राची उत्सुकता असते. ते आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतात. नवरी घरात येते आणि वेगवेगळे रिवाज पार पाडताना सगळेच खूप एन्जॉय करतात. अशात तुम्हाला जर समजलं की, तुमच्या घरात आलेली नवरी 'लुटेरी दुल्हन' आहे आणि नवरदेवाच्या घरातील सगळं काही ती लुटून घेऊन गेली तर? अर्थातच मुलाकडील लोकांना धक्का बसेल. अशीच एक घटना समोर आली आहे.

राजस्‍थानच्या भरतपूरमधील ही घटना आहे. मधुचंद्राला नवदाम्पत्य त्यांच्या नव्या जीवनाची सुरूवात करतात. पण जेव्हा नवरदेवाला हे समजतं की, जिच्या आलिंगणाला त्याच्या संसार समजत आहे ती 'लुटेरी दुल्हन' गॅंगची सदस्य आहे तर तेव्हा त्याच्या मनात काय चालू असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. ही घटना भरतपूर जिल्ह्याच्या बैसोडा गावातील आहे. 

नवी नवरी लग्नाच्या काही दिवसांनंतर घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊ फरार झाली. नवरीच्या या कृत्यामुळे नवरदेवाला धक्का बसला, तर त्याच्या परिवारात एक गोंधळ झाला.

हे प्रकरण जेव्हा पोलिसात गेलं तेव्हा सगळेच हैराण झाले. पोलिसांनी लगेच कारवाई करत गॅंगमधील 2 महिलांना आणि एका दलालाला अटक केली. चौकशीत तर दलालाने आणखी धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितलं की, त्याने दोन्ही महिलांना 2-2 हजार दिवसाच्या हिशेबाने कामावर ठेवलं आहे. म्हणजे गॅंग तरूणींना 2-2 हजार रूपये देऊन त्यांचं लग्न लावून देत होता. नंतर नवरदेवाच्या घरात चोरी करून त्या फरार होत होत्या.

मीडिया रिपोर्टनुसार, मुलाच्या परिवाराकडून तक्रार दिल्यावर आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी एका महिलेला उत्‍तर प्रदेशच्या फिरोजाबाद तर दुसरीला मैनपुरीमधून अटक केली होती. हे खरंच धक्कादायक आहे की, नवरी रोजाच्या हिशेबाने भाड्याने आणली जाते आणि त्यांच्याकडून चोरी करून घेतली जाते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी