शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

EXCLUSIVE : वरवरा राव, सुरेंद्र गडलिंग यांच्या पैशांवरून पत्रव्यवहार; धक्कादायक उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 12:47 IST

एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) हा गुन्हा वर्ग करण्याची मागणी करणारं पत्र न्यायालयाला दिल्याने ही सुनावणी लांबणीवर गेली आहे.

ठळक मुद्देसाईबाबा यांच्या बाबतच्या न्यायालयीन लढ्यात आलेल्या अपयशाच स्पष्टीकरण देण्याचा ही प्रयत्न गडलिंग यांनी केलेला दिसतो आहे.ही सगळी पत्रं गोपनीय पुरावे म्हणून न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

पुणे - नक्षलवादी चळवळीच्या कामकाजासाठी पैसे पाठवण्यात सुरेंद्र गडलिंग अपयशी ठरत असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे तर गडलिंग यांनी ही वरवरा राव यांना उत्तरा दाखल लिहलेलं पत्रं न्यायालयात पुरावे म्हणून सुपूर्द करण्यात आलं आहे. ज्यात पूर्ण प्रयत्न सुरू असून नक्षलवादी चळवळीला अपेक्षित असलेल काम सुरू असल्याच म्हटलंय तर साईबाबा यांच्या बाबतच्या न्यायालयीन लढ्यात आलेल्या अपयशाच स्पष्टीकरण देण्याचा ही प्रयत्न गडलिंग यांनी केलेला दिसतो आहे.ही सगळी पत्रं गोपनीय पुरावे म्हणून न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. मात्र, ती खोटी असल्याचा आक्षेप आरोपींनी घेतला आहे. त्यावर आरोपींकडून हव्या त्या तज्ज्ञांची नेमणूक करून तपासणी करण्याची मुभा सत्र न्यायालयाने दिली होती. मात्र, दरम्यान एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) हा गुन्हा वर्ग करण्याची मागणी करणारं पत्र न्यायालयाला दिल्याने ही सुनावणी लांबणीवर गेली आहे.

एल्गार प्रकरण: एनआयएच्या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी; सरकार आणि बचाव पक्षाने मागितली मुदत

शरद पवार यांच्या भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबतच्या भूमिकेचे आंबेडकरी जनतेच्यावतीने स्वागत

एनआयएने न्यायालयात केलेल्या अर्जावर बाजू मांडण्यास पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी दोन्ही पक्षांच्या वतीने सोमवारी न्यायालयात करण्यात आली होती. यावर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी म्हणजे आज होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच एल्गार आणि कथित माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत याचा निर्णय या वेळी होणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयात अर्ज करून या प्रकरणाची कागदपत्रे पुरविण्यात यावीत तसेच यापुढे हा खटला मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवावा, असा अर्ज केला होता.

एनआयएने न्यायालयात केलेला अर्ज न मिळाल्याने त्यावर बाजू मांडण्यास वेळ मिळावा, अशी मागणी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली होती. तर तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईत घेण्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे एनआयएच्या अर्जावर युक्तीवाद करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली होती. राज्याचे पोलीस महासंचालक यांना तपास अधिकाऱ्यांनी याबाबत पत्र पाठवले होते. त्यावर अद्याप उत्तर आलेले नसून गृह विभागाचे पत्र येण्याकरिता वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती. 

 

टॅग्स :Courtन्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणे