शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

EXCLUSIVE : वरवरा राव, सुरेंद्र गडलिंग यांच्या पैशांवरून पत्रव्यवहार; धक्कादायक उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 12:47 IST

एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) हा गुन्हा वर्ग करण्याची मागणी करणारं पत्र न्यायालयाला दिल्याने ही सुनावणी लांबणीवर गेली आहे.

ठळक मुद्देसाईबाबा यांच्या बाबतच्या न्यायालयीन लढ्यात आलेल्या अपयशाच स्पष्टीकरण देण्याचा ही प्रयत्न गडलिंग यांनी केलेला दिसतो आहे.ही सगळी पत्रं गोपनीय पुरावे म्हणून न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

पुणे - नक्षलवादी चळवळीच्या कामकाजासाठी पैसे पाठवण्यात सुरेंद्र गडलिंग अपयशी ठरत असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे तर गडलिंग यांनी ही वरवरा राव यांना उत्तरा दाखल लिहलेलं पत्रं न्यायालयात पुरावे म्हणून सुपूर्द करण्यात आलं आहे. ज्यात पूर्ण प्रयत्न सुरू असून नक्षलवादी चळवळीला अपेक्षित असलेल काम सुरू असल्याच म्हटलंय तर साईबाबा यांच्या बाबतच्या न्यायालयीन लढ्यात आलेल्या अपयशाच स्पष्टीकरण देण्याचा ही प्रयत्न गडलिंग यांनी केलेला दिसतो आहे.ही सगळी पत्रं गोपनीय पुरावे म्हणून न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. मात्र, ती खोटी असल्याचा आक्षेप आरोपींनी घेतला आहे. त्यावर आरोपींकडून हव्या त्या तज्ज्ञांची नेमणूक करून तपासणी करण्याची मुभा सत्र न्यायालयाने दिली होती. मात्र, दरम्यान एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) हा गुन्हा वर्ग करण्याची मागणी करणारं पत्र न्यायालयाला दिल्याने ही सुनावणी लांबणीवर गेली आहे.

एल्गार प्रकरण: एनआयएच्या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी; सरकार आणि बचाव पक्षाने मागितली मुदत

शरद पवार यांच्या भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबतच्या भूमिकेचे आंबेडकरी जनतेच्यावतीने स्वागत

एनआयएने न्यायालयात केलेल्या अर्जावर बाजू मांडण्यास पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी दोन्ही पक्षांच्या वतीने सोमवारी न्यायालयात करण्यात आली होती. यावर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी म्हणजे आज होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच एल्गार आणि कथित माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत याचा निर्णय या वेळी होणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयात अर्ज करून या प्रकरणाची कागदपत्रे पुरविण्यात यावीत तसेच यापुढे हा खटला मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवावा, असा अर्ज केला होता.

एनआयएने न्यायालयात केलेला अर्ज न मिळाल्याने त्यावर बाजू मांडण्यास वेळ मिळावा, अशी मागणी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली होती. तर तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईत घेण्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे एनआयएच्या अर्जावर युक्तीवाद करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली होती. राज्याचे पोलीस महासंचालक यांना तपास अधिकाऱ्यांनी याबाबत पत्र पाठवले होते. त्यावर अद्याप उत्तर आलेले नसून गृह विभागाचे पत्र येण्याकरिता वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती. 

 

टॅग्स :Courtन्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणे