शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Lakhimpur Kheri Case : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगाच मुख्य आरोपी, ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:26 IST

Lakhimpur Kheri Case : या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे.

लखनऊ - देशभर खळबळ उडवून देणाऱ्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणी चौकशी करत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज एकूण १४ आरोपींविरुद्ध लखनऊ कोर्टात ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. घटना घडली तेव्हा आशिष घटनास्थळी होता, असे एसआयटीने आरोपपत्रात नमूद केले आहे. 

लोखंडी पेटीत ५ हजार पानांचे आरोपपत्र घेऊन एसआयटीची टीम लखनऊ न्यायालयात पोहोचली. आरोपपत्रात पोलिसांनी आशिष मिश्रा यांच्या आणखी एका नातेवाईकालाही आरोपी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र शुक्ला यांच्यावर पुरावे लपवल्याचा आरोप आहे. आशिष मिश्रा यांच्या जीपच्या मागे धावणाऱ्या दोन वाहनांपैकी एक वीरेंद्रची स्कॉर्पिओ होती. आधी शुक्लाने आपली स्कॉर्पिओ लपवली आणि दुसऱ्याची गाडी दाखवली. आशिष मिश्रा यांच्या शस्त्रांनी गोळीबारएसआयटीने आपल्या तपासात लखीमपूर हिंसाचारात आशिष मिश्रा याने शस्त्रांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. आशिष मिश्रा यांच्या रिव्हॉल्व्हर आणि रायफलमधूनही गोळीबार करण्यात आला. आशिष मिश्रा आणि अंकित दास परवानाधारक शस्त्रांनी गोळीबार करत होते, असे एसआयटीने आरोपपत्रात म्हटले आहे. तर आशिष मिश्रा म्हणाले होते की, 1 वर्षापासून त्यांच्या शस्त्रांमधून गोळीबार झाला नाही. बॅलेस्टिक अहवालाच्या आधारे पोलिसांनी गोळीबाराला दुजोरा दिला आहे.या प्रकरणातील १३ आरोपी तुरुंगात आहेतया प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे. वीरेंद्रवर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. वीरेंद्र हे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मेहुणा आहे आणि पालिया ब्लॉकचे सध्याचे ब्लॉक प्रमुख आहेत.3 ऑक्टोबर रोजी हिंसाचार झाला होता३ ऑक्टोबर रोजी लखीमपूरमधील तिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू याने आपल्या जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली.याप्रकरणी एसआयटीचा अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये लखीमपूरच्या तिकुनिया येथील हिंसाचार हा अपघात किंवा निर्घृण हत्या नसून हत्यार घेऊन गंभीर कट रचून खुनाच्या प्रयत्नाची घटना असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीवरून कोर्टाने आशिष मिश्रा यांच्याविरोधात आणखी कडक कलमे लावली आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPoliceपोलिसCourtन्यायालयHome Ministryगृह मंत्रालयFiringगोळीबार