शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Lakhimpur Kheri Case : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगाच मुख्य आरोपी, ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:26 IST

Lakhimpur Kheri Case : या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे.

लखनऊ - देशभर खळबळ उडवून देणाऱ्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणी चौकशी करत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज एकूण १४ आरोपींविरुद्ध लखनऊ कोर्टात ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. घटना घडली तेव्हा आशिष घटनास्थळी होता, असे एसआयटीने आरोपपत्रात नमूद केले आहे. 

लोखंडी पेटीत ५ हजार पानांचे आरोपपत्र घेऊन एसआयटीची टीम लखनऊ न्यायालयात पोहोचली. आरोपपत्रात पोलिसांनी आशिष मिश्रा यांच्या आणखी एका नातेवाईकालाही आरोपी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र शुक्ला यांच्यावर पुरावे लपवल्याचा आरोप आहे. आशिष मिश्रा यांच्या जीपच्या मागे धावणाऱ्या दोन वाहनांपैकी एक वीरेंद्रची स्कॉर्पिओ होती. आधी शुक्लाने आपली स्कॉर्पिओ लपवली आणि दुसऱ्याची गाडी दाखवली. आशिष मिश्रा यांच्या शस्त्रांनी गोळीबारएसआयटीने आपल्या तपासात लखीमपूर हिंसाचारात आशिष मिश्रा याने शस्त्रांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. आशिष मिश्रा यांच्या रिव्हॉल्व्हर आणि रायफलमधूनही गोळीबार करण्यात आला. आशिष मिश्रा आणि अंकित दास परवानाधारक शस्त्रांनी गोळीबार करत होते, असे एसआयटीने आरोपपत्रात म्हटले आहे. तर आशिष मिश्रा म्हणाले होते की, 1 वर्षापासून त्यांच्या शस्त्रांमधून गोळीबार झाला नाही. बॅलेस्टिक अहवालाच्या आधारे पोलिसांनी गोळीबाराला दुजोरा दिला आहे.या प्रकरणातील १३ आरोपी तुरुंगात आहेतया प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे. वीरेंद्रवर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. वीरेंद्र हे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मेहुणा आहे आणि पालिया ब्लॉकचे सध्याचे ब्लॉक प्रमुख आहेत.3 ऑक्टोबर रोजी हिंसाचार झाला होता३ ऑक्टोबर रोजी लखीमपूरमधील तिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू याने आपल्या जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली.याप्रकरणी एसआयटीचा अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये लखीमपूरच्या तिकुनिया येथील हिंसाचार हा अपघात किंवा निर्घृण हत्या नसून हत्यार घेऊन गंभीर कट रचून खुनाच्या प्रयत्नाची घटना असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीवरून कोर्टाने आशिष मिश्रा यांच्याविरोधात आणखी कडक कलमे लावली आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारPoliceपोलिसCourtन्यायालयHome Ministryगृह मंत्रालयFiringगोळीबार