शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सर्वात मोठी कारवाई! तब्बल 111 किलो चरस जप्त; पोलिसांनी संपूर्ण गावच केलं सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 09:13 IST

Drugs News : पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेअंतर्गत पोलिसांना मोठं यश मिळालं असून आतापर्यंतचा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कुल्लू पोलिसांनीअमली पदार्थांविरोधातील मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेअंतर्गत पोलिसांना मोठं यश मिळालं असून आतापर्यंतचा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी बंजार येथील श्रीकोट पंचायतीमधील शिजाहू गावातून तब्बल 111 किलो चरस जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने संपूर्ण शिजाहू गावच सील करण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या टीमला या गावामध्ये एक चरस माफिया असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी एका पुरुषासहीत महिलेलाही अटक केली आहे. या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारस यासंदर्भातील माहिती दिली आहे. बंजारचे पोलीस उपाधीक्षक बिन्नी मिन्हास यांच्या नेतृत्वाखाली बंजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

बंजार पोलिसांनी याआधीही अशाप्रकारची कारवाई केली असली तरी यंदा सापडलेला साठा हा अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा आहे. गेल्या वर्षीही बंजार पोलिसांनी 42 किलो चरस जप्त केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. कुल्लू पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत आतापर्यंत अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. कारवाई केल्यानंतर या अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांच्या संपत्तीसंदर्भातील तपासही केला जात असून आतापर्यंत कुल्लू पोलिसांनी तीन कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ

अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ झालेला पाहायला मिळतो. अनेकांची नावं ही यादीतून गायब असतात. तर काही ठिकाणी जास्त मतदारांच्या नावाची नोंद असते. अशीच एक घटना आता हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्येही असाच एक घोळ समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करत मतदार यादीच्या विश्वासार्हतेसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. 

आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच काही फोटो शेअर करून निवडणुकींमध्ये काहीतरी घोळ असल्याचा आरोप देखील केला आहे. अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ