शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

कोरेगाव-भीमा प्रकरण : केंद्राच्या पत्राशिवाय कागदपत्रे सुपूर्द न करण्यास सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 22:12 IST

मुख्यमंत्र्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

ठळक मुद्देपोलीस महासंचालक सुबोध जायसवाल आणि राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी चर्चा करुन या प्रकरणाचा पुर्ण आढावा घेतला.पुण्यात झालेली एल्गार परिषद व त्यानंतर झालेल्या दंगलीवेळी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

मुंबई : कोरेगाव -भीमा दंगल प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए) उत्सुक असलीतरी त्याबाबतची गुंतागुत वाढत चालली आहे. दंगलीचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याबाबत केंद्राकडून अधिकृतपणे कळविण्यात न आल्याने याप्रकरणाचा दस्ताऐवज तुर्तास दुसऱ्या यंत्रणेकडे न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी याप्रकरणी गृहसचिवांसह पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल आणि राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी चर्चा करुन या प्रकरणाचा पुर्ण आढावा घेतला. 

एल्गार परिषद प्रकरणी प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने

पुण्यात झालेली एल्गार परिषद व त्यानंतर झालेल्या दंगलीवेळी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. राज्य घटनेने राज्य सरकारकडे असलेले अधिकार आणि कायद्याच्या अधीन राहून याप्रकरणी भूमिका निश्चित करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे याबाबत सावधगिरीने पावले उचलण्यात येत असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे.

एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयए'ची टीम पुण्यात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा दंगलीच्या तपासामध्ये पूर्वगृह दुषित ठेवून निरपराधावर कारवाई केली आहे, असा आक्षेप घेत याबाबत विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन करुन तपास करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने या गुन्ह्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) परस्पर सोपविला आहे.मात्र, राज्य सरकारने त्याबाबत केंद्राशी असहकार्य करीत आपल्या अधिकाराचा पुर्ण वापर करण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून पूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. केंद्राच्या दबावाला न पडता घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे याबाबत भूमिका घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारRashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा