शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

25 लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांना ठाेकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 20:22 IST

kidnapping Case : पुण्यातील अपहरण झालेले दिरंबर चिताेडीया यांची सुटका; रायगड पाेलिसांची कारवाई     

ठळक मुद्देवामन मारुती शिंदे (39), बदलापूर, याेगेंद्र प्रसाद (25) अंबरनाथ,दिलीप पासवान (32), धुरुपचंद यादव (33), संदीप प्रकाश साेनावणे (35) सर्व राहणार अंबरनाथ अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत.         30 सप्टेंबर 21 राेजी खाेपाेली पाेलिस रात्री गस्त घालत हाेते. त्यावेळी त्यांना एक अल्टाे कार दिसून आली.

रायगड ः रात्री गस्त घालत असताना खाेपाेली पाेलिसांनी पाच अपहरणकर्त्यांना बेड्या ठाेकल्या आहेत. तसेच 25 लाखांची खंडणीची मागणी करुन उपहरण केलेल्या व्यक्तीचीही पाेलिसांनी सुटका केली आहे. सदरच्या पाचही आराेपींना हिंजवडी पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, तसेच अपहरण झालेले दिगंबर इंदलसिंग चिताेडीया यांनाही पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वामन मारुती शिंदे (39), बदलापूर, याेगेंद्र प्रसाद (25) अंबरनाथ,दिलीप पासवान (32), धुरुपचंद यादव (33), संदीप प्रकाश साेनावणे (35) सर्व राहणार अंबरनाथ अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत.                                    

30 सप्टेंबर 21 राेजी खाेपाेली पाेलिस रात्री गस्त घालत हाेते. त्यावेळी त्यांना एक अल्टाे कार दिसून आली. त्या कारच्या दाेन्ही नंबर प्लेटवर चिखल लावण्यात आल्याचे आढळून आले. सहायक पाेलिस निरीक्षक  हरेश काळसेकर, पाेलिस शिपाई आर.एस.मासाळ आणि एस.ए. तांबे यांना संशय आला. त्यांनी कारमधील व्यक्तींची चाैकशी सुरु केली. तेव्हा पाच जणांनी नाव,पत्ता आणि माेबाईल क्रमांक सांगितला, तसेच अधिक सखाेल चाैकशी करताना उडवा-उडवीची उत्तरे दिली. अन्य एक व्यक्तीही त्यांच्यासाेबत हाेती. त्याची चाैकशी केली असता त्यांनी त्याचे नाव दिगंबर इंदलसिंग चिताेडीया रा मुळशी, पुणे असे सांगितले, तसेच मला वाचवा संबंधीतांनी माझे अपहरण केले आहे. गेल्या दाेन दिवसांपासून त्यांनी मला अंबरनाथ येथे डांबून ठेव्याचे सांगितले. त्यांनतर पाेलिस सर्वांना घेऊन खाेपाेली पाेलिस ठाण्यात आले. अधिक चाैकशी केल्यानंतर हिंजवडी पाेलिस ठाण्यामध्ये अपहरण आणि 25 लाख रुपयांची खंडणी मागणे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उघड झाले.खाेपाेली पाेलिसांनी अपहरण झालेले दिगंबर आणि पाचही आराेपींना हिंजवडी पाेलिसांच्या ताब्यात दिले.                                                                                                                                ----                                                                                                                                                    

दिगंबर चिताेडीया हे पुण्यातील प्रसिध्द आैषध व्यावसायिक आहेत. दिगंबर यांचे आजाेबा-पंजाेबा हे राजे-राजवाड्यांना औषधे पुरवत असत. पुढे त्यांनीही ताेच व्यवसाय सुरु ठेवला आहे, अशी माहिती खाेपाेली पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. 

टॅग्स :KidnappingअपहरणalibaugअलिबागRaigadरायगडPoliceपोलिसArrestअटकPuneपुणेambernathअंबरनाथ