शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत डोकावून माकड पुन्हा पुन्हा करत होते इशारा, लोकांनी जाऊन पाहिलं तर बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 12:03 IST

हीरामन पुरवामध्ये एका कोरड्या विहिरीत महिलेचा मृतदेह पडला होता. महिला त्याच परिसरात राहत होती, ती सकाळी शौचास बाहेर गेली होती. तेव्हापासून बेपत्ता होती. 

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये माकडांनी विहिरीत पडलेला एक मृतदेह शोधून काढला. माकडांनी परिसरातील लोकांना इशारा करून करून विहिरीत पडलेल्या मृतदेहाची माहिती दिली. हीरामन पुरवामध्ये एका कोरड्या विहिरीत महिलेचा मृतदेह पडला होता. महिला त्याच परिसरात राहत होती, ती सकाळी शौचास बाहेर गेली होती. तेव्हापासून बेपत्ता होती. 

परिसरातील गोपाल सिंह चौहान यांनी सांगितलं की, पुन्हा पुन्हा दोन ते तीन माकड येत होते आणि विहीरीवर बसून आत जात होते आणि  मग लोकांकडे बघत होते. हे एकदा नाही तर अनेकदा त्यांनी केलं. तेव्हा गोपाल सिंह चौहान इतर लोकांना घेऊन विहिरीवर गेले. त्यांना वाटलं की, कदाचित माकडाचं पिल्लू पडलं असेल ज्यामुळे ते असं करत असतील. (हे पण वाचा : तीनवेळा लग्न केलं, तिसऱ्यांदा संसार मोडला; माहेरी आली अन् खुर्चीवर बसलेल्या वडीलांची हत्या केली)

गोपाल सिंह चौहान म्हणाले की, जेव्हा आम्ही विहिरीत पाहिलं तर आम्हाला धक्का बसला. आम्हाला दिसलं की, परिसरातच राहणारी महिला राधा देवी कश्यपचा मृतदेह विहिरीत पडला आहे. मृतदेह दिसल्यावर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं आणि त्यांनी ६ तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

याप्रकरणी एसीपीसी सीसामऊ म्हणाले की, महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. महिला तिच्या मुलीच्या शाळेच्या अॅडमिशनमुळे चिंतेत होती. असा अंदाज आहे की,  तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असेल. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी