शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी; तेलंगणाच्या हद्दीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 19:51 IST

Drowing Case :दरम्यान सदर दुर्घटनेची माहिती आरोग्य विभागात कार्यरत असणारे हसरत पठाण व  हिमायत शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांना सांगितली.

ठळक मुद्दे सलमान मलिक (20 वर्ष) असे त्या युवकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील मेरठ जवळील गुलावटी येथील रहिवासी आहे.

अहेरी (गडचिरोली) : अहेरीपासून काही अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर फिरण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. आज त्याचा मृतदेह तेलंगणा राज्याच्या हद्दीतून शोधून काढण्यात यश आले. सलमान मलिक (20 वर्ष) असे त्या युवकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील मेरठ जवळील गुलावटी येथील रहिवासी आहे.

मूळचे उत्तर प्रदेशातील पण अहेरी येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे फरमान मलिक यांच्याकडे मृत सलमान हा डिझाइन कार्पेन्टर म्हणून काम करायचा. तो मालक फरमान मलिक यांचा साळा आहे.शनिवारी सुट्टी होती. त्यामुळे सलमानसह त्याच्यासोबत काम करणारे शदाब शरोब चौधरी (18) व आसिम शेफिक (18) रा.गाझियाबाद (उ.प्र.) हे तिन्ही युवक प्राणहीता नदीघाटावर फिरायला गेले. रिमझिम पावसामुळे ते युवक पुलाच्या खाली उतरले. यादरम्यान मालक फरमान यांनी फोन करून त्यांना अहेरीकडे येण्यास सांगितले. हो निघालो, असे म्हणत पाय धुण्यासाठी ते नदीच्या किनाऱ्यावर गेले. याचवेळी सलमान याचा तोल गेल्याने तो नदीत पडला. सलमानला वाचविण्यासाठी आधी शदाब व शदाबला वाचविण्यासाठी आसिम  पाण्यात गेले. शदाब व आसिम कसेबसे पाण्याच्य बाहेर निघाले पण सलमान मलिक पाण्यात वाहून गेला.

मालक फरमान यांचे फिरायला गेलेल्या युवकांशी काही मिनिटाअगोदर बोलणे झाले, पण नंतर कुठलाच संपर्क होत नसल्याने भयभीत होऊन त्यांनी नदीकडे धाव घेतली असता त्यांना ही दुर्घटना कळली. वेळीच नदीकडे धाव घेतले असता दुर्घटना कळली. घटनास्थळ तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने फरमान यांनी तेलंगणातील मानेपल्ली पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. पण त्यांना योग्य ती मदत मिळू शकली नाही. 

दरम्यान सदर दुर्घटनेची माहिती आरोग्य विभागात कार्यरत असणारे हसरत पठाण व  हिमायत शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांना सांगितली. त्यांनी अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्याम गव्हाणे व तहसीलदार ओंकार ओतारी यांना कळविले. त्यांनी ही दुर्घटना कोणाच्या सीमेत घडली याचा विचार न करता तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण अंधार पडल्यामुळे व पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाण्यात नावेने शोध घेणे शक्य नव्हते. रविवारी सकाळी शोधमोहीम राबविल्यानंतर मृतदेह सापडला.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस