शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

बाबो! उच्चशिक्षित तरुणीचा दुधवाल्यावर जीव जडला, संसार थाटला अन् धक्कादायक प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:35 IST

एक उच्चशिक्षित तरुणी तिच्या घरी दूध द्यायला येणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. मोबाईलवर डिजीटल पेमेंट करता-करता दोघांचं सूत जुळलं आणि इतकंच नव्हे तर दोघांनी लग्नही केलं.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये लग्नानंतर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक उच्चशिक्षित तरूणी तिच्या घरी दूध द्यायला येणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. मोबाईलवर डिजीटल पेमेंट करता-करता दोघांचं सूत जुळलं आणि इतकंच नव्हे तर दोघांनी लग्नही केलं. मात्र, त्यानंतर तिचा पती हा अचानक गायब झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. तिचा पती हा शहर सोडून मुंबईला फरार झाला आहे, असे तपासात समोर आले आहे.

इंदूरच्या बाणगंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतू जोशी नावाच्या मुलीने तिच्याच पतीविरोधात तक्रार केली आहे. तक्रारीनंतर बाणगंगा पोलीस ठाण्यात पती हिमांशू जोशी याच्याविरुद्ध फसवणूक आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू जोशी हा नीतूच्या घरी दूध देण्यासाठी येत असे. याआधी दोघे कधीच बोलले नव्हते. पण, दूध दिल्यानंतर एक महिन्यानंतर नीतूने हिमांशूच्या नंबरवर डिजिटल पेमेंट केले. या पेमेंटसाठी दोघांनी एकमेकांचे नंबर सेव्ह केले. त्यानंतर हिमांशू कधी-कधी मुलीला मेसेज करायचा. या बहाण्याने दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. 

नीतू आणि हिमांशूमधील बोलणे वाढले आणि तिने़ दूध विक्रेत्या हिमांशू आणि नीतूचा एकमेकांवर जीव जडला. प्रेमानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि इतकेच नव्हे तर लग्नही केले. लग्न होईपर्यंत दोघांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती नव्हती. लग्न झाल्यानंतरही हिमांशूने पत्नी नीतूला एकदाही घरी नेले नाही. तो आपल्या पत्नीला वचन देत राहिला की लवकरच सर्व काही ठिक होईल आणि त्यानंतर दोघेही एकत्र राहू. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले. मात्र, एके दिवशी पती पत्नी नीतूला न सांगता अचानक गायब झाला. यानंतर नीतूने एअरपोर्ट रोडवरील हिमांशूचे घर गाठले. तर तिथे तो बाहेर असल्याची माहिती तिला त्याच्या कुटुंबीयांना दिली.

नीतू त्याला सतत फोन करत राहिली. मात्र, त्याने उत्तर दिले नाही. डिसेंबरमध्ये हिमांशूने फोन करून सांगितले की, तो कामानिमित्त मुंबईत आहे आणि लवकरच परत येईल. मात्र, यानंतरही तो सतत खोटे बोलत राहिला. त्यानंतर त्याने नीतूसोबत बोलणेही बंद केले. अनेक प्रयत्न करूनही हिमांशूकडून प्रतिसाद न आल्याने अखेर ती नातेवाईकांकडे गेली. मात्र, कुटुंबीयांनीही समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर नीतूने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी