शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात दहशतवादी संघटना ISIS च्या निशाण्यावर भारत? यूएन रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 14:32 IST

भारतात ISIS कोविड १९ नावाखाली लोकांकडून पैसे मागत आहेत, लोकांमध्ये त्यांचा प्रोपेगेंडा पसरवत आहे.

ठळक मुद्देकेरळ आणि कर्नाटकातून काही संशयित लोकांवर कारवाई इराक, सिरियानंतर आता ISIS चा मोर्चा भारताकडे?भारतात पहिल्यांदाच विलायह ऑफ हिंद नावाच्या प्रांताची स्थापना

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या रिपोर्टमुळे भारतासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. यामध्ये ISIS ही  दहशतवादी संघटना भारतासाठी धोकादायक बनण्याची चिन्हं दिसत आहेत. रिपोर्टनुसार ISIS चे १८०-२०० सदस्य भारतात सक्रीय आहेत. हे सदस्य केरळ आणि कर्नाटकसारख्या राज्यात पसरले आहेत. त्याचसोबत ISIS ने भारतात विलायह ऑफ हिंद प्रांत बनवण्याची घोषणा केली आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबत रिपोर्ट दाखवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, भारतात ISIS कोविड १९ नावाखाली लोकांकडून पैसे मागत आहेत, लोकांमध्ये त्यांचा प्रोपेगेंडा पसरवत आहे. एका मॅगजीनच्या सहाय्याने लॉकडाऊन दरम्यान ISIS चा प्रोपेगेंडा पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात मुस्लीम समुदायाच्या लोकांना भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. कोरोना महामारी संधी असून यामाध्यमातून जिहाद पसरवण्याचं सांगितलं जात आहे.

भारतीय तपास यंत्रणा यादिशेने चौकशी करत असून त्यांना यशही मिळालं आहे. त्यांनी केरळ आणि कर्नाटकातून काही संशयित लोकांवर कारवाई केली आहे. हे सर्व लोक टेलीग्रामच्या माध्यमातून त्यांचे संघटन चालवत होते. त्यासोबत फेसबुकवर फेक नावाने सक्रीय होते. सध्या स्पेशल सेल आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्था खुरासान मॉड्यूलची पडताळणी करत आहेत. जे मॅगजीनद्वारे प्रोपेगेंडा पसरवत आहेत.

आतापर्यंत या प्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात हिना बशीर बेग, जहानजेब, अब्दुल बाशित, सादिया अनवर शेख आणि नबेल यांचा समावेश आहे. हे सर्व सीएए आणि नागरिकत्वा सुधारणा कायद्याच्या नावाखाली युवकांना भडकावत होते, दिल्लीत लोन वुल्फ अटक प्लॅनिंगदेखील करत होते. त्यासोबत दहशतवादी कारवाया करण्यासाठी स्फोटकांची मागणी करत होते.  

इस्लामिक स्टेट(ISIS) ने पहिल्यांदाच भारतात प्रांत स्थापन करण्यात यशस्वी झालं आहे. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार काश्मीरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीनंतर हा दावा करण्यात आला आहे. या प्रांतचं नाव विलायह ऑफ हिंद असं ठेवलं आहे. एप्रिलमध्ये इराक आणि सिरीयातून आयएसच्या वर्चस्वाला धक्का पोहचल्यानंतर त्यांनी आत्मघातकी हल्ल्याचं प्रमाण वाढवलं आहे काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले होते यात २५३ लोकांचा मृत्यू झाला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पहिला कोरोना संशयित आढळल्यानं उत्तर कोरियात आणीबाणीची घोषणा

केंद्र सरकारची मोठी योजना; पेट्रोल, डिझेल, सीएनजी नाही तर आता ‘HCNG’ वर कार धावणार

“ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली तोच पक्षाचा सर्वोच्च नेता अन् राज्याचा मुख्यमंत्री झाला”

तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'

मी कोणाच्या उज्ज्वल भवितव्याच्या आड येत नाही, पण...; उद्धव ठाकरेंचा नेम अजित पवारांवर?

टॅग्स :ISISइसिसterroristदहशतवादीIndiaभारत