शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Ind vs Eng: तर चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही भारत WTC च्या अंतिम फेरीसाठी ठरेल पात्र, असं आहे समीकरण  

By बाळकृष्ण परब | Updated: March 3, 2021 20:37 IST

Indian Cricket team News : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे.

नवी दिल्ली - तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने आयसीसी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता चौथ्या कसोटीत विजय मिळवल्यास किंवा हा सामना अनिर्णित राखल्यास भारतीय संघ थेट अंतिम फेरीत जाणार आहे. मात्र या सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे. त्याच्यामागे एक विशिष्ट्य कारण आहे.  (So even after losing the fourth Test, India will qualify for the WTC finals, that's the equation)याआधीच्या समीकरणांनुसार इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-१, २-१ किंवा २-० असा विजय मिळवल्यास भारतीय संघ विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. तर ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची संधी असेल. मात्र आता ऑस्ट्रेलियाची ही संधी हुकण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आयसीसीकडे तक्रार केली आहे. तसेच दौरा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्यांच्या गुणांमध्येही कपात करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता आयसीसीने अशी कारवाई केल्यास ऑस्ट्रेलियाची कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची अंधूक आशाही मावळणार आहे. या संदर्भातील वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिपच्या रँकिंगमध्ये कोरोनामुळे बदल करण्यात आले आहे. आता सांघांची रँकिंग पर्सेंटेज पॉईंट्सच्या आधारावर निर्धारित होत आहे. भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीनंतर पॉईंट्स टेबलवर नजर टाकल्यास भारतीय संघ ७१ पर्सेंटेज पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ७० टक्के पर्सेंटेज पॉईंट्ससह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया ६९.२ पर्सेंटेज पॉईंट्ससह तिसऱ्या आणि इंग्लंड ६४.१ पर्सेंटेज पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :ICC World Test Championshipजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघVirat Kohliविराट कोहलीIndia VS Englandभारत विरुद्ध इंग्लंड