शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

कोरोना काळात सर्वसामान्यांचे दिवाळं तर चोरट्यांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:38 IST

Robbery Case :दोन वर्षात ५५.४४ कोटीच्या मुद्देमालावर डल्ला

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : कोरोनामुळे नोकरी, उद्योगांवर कोसळलेल्या कुऱ्हाडीमुळे सर्वसामान्यांचे दिवाळे निघाले असतानाच, चोरट्यांची मात्र चांदी झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या कोरोना काळातल्या दोन वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ५५ कोटी ४४ लाखाच्या मुद्देमालावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. त्यापैकी १९ कोटी ३५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, उर्वरित ३६ कोटी ८ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी फस्त केला आहे.

नवी मुंबईत वाढती गुन्हेगारी पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण करत आहे. शहरात चोरी, घरफोडी, जबरी लूट, सोनसाखळी चोरी अशा घटना दिवसेंदिवस घडत आहेत. त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरटे पळवत आहेत. त्यात नवी मुंबईतल्या गुन्हेगारांसह शहराबाहेरील टोळ्या सक्रिय आहेत. अनेकदा अशा टोळ्यांच्या मुक्ष्या आवळून पोलीस गुन्हा उघड देखील करतात. मात्र गुन्हेगार हाती लागूनही त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल पुन्हा हस्तगत करण्यात पुरेशे यश मिळत नाही. यामुळे गुन्हेगारांचे शिकार बनलेल्या सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडत असते. त्यातच २०२० मध्ये देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काहींच्या उद्योग व्यवसायाला कायमचे टाळे लागले, तर काहींना नोकरी गमवावी लागली. यामुळे आलेल्या नैराश्यातून काहींनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना नवी मुंबईसह पनवेल परिसरात घडल्या आहेत.

मात्र कोरोनामुळे सर्वसामान्य जरी होरपळला असला तरी, चोरट्यांची मात्र या कालावधीत देखील चांदी झाल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही वेगवेगळ्या गुन्ह्यात नवी मुंबईसह पनवेल, उरण मधून तब्बल २५ कोटी १८ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी पळवला होता. त्यानंतर २०२१ मध्ये सर्वसामान्यांची गाडी रुळावर येत असतानाच चोरटयांनी देखील गुन्ह्यांचा सपाटा लावला होता. त्यामुळे गतवर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ३० कोटी २५ लाखाच्या ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. 

२०१९ मध्ये चोरटयांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून २२६० गुन्ह्यात तब्बल २८ कोटी ९२ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी लुटला होता. मात्र कोरोनामुळे २०२० मध्ये देखील चोरट्यांकडून हातसफाई सुरु असतानाच २०२१ मध्ये देखील २२६८ गुन्ह्यात तब्बल ३० कोटी २५ लाखाचा ऐवज लुटला आहे.

मुद्देमालाशी संबंधित गुन्ह्यांची उकल करून त्यामधील ऐवज हस्तगत करण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत. गुन्हा उघड होण्यास विलंब झाल्यास, त्या कालावधीत गुन्हेगारांकडून त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली जाते. परिणामी त्या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागत नाही. यामुळेच २०१९ मध्ये ३१.८७ टक्के, २०२० मध्ये ४२.४४ टक्के तर २०२१ मध्ये केवळ २८.६५ टक्के मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

मालमत्तेचे गुन्हे     -             २०२१             २०२०               २०१९चोरीला गेला मुद्देमाल - ३०,२५,६३,००६ - २५,१८,३९,२७८ - २८,९२,६२,४३५हस्तगत केला मुद्देमाल - ८,६६,७७,०६१  - १०,६९,२१,२५१ - ९,२२,०१,७३२चोरटयांनी फस्त केला - २१,५८,८५,९४५ - १४,४९,१८,०२७ - १९,७०,६०,७०३

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसRobberyचोरीcorona virusकोरोना वायरस बातम्या