शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोना काळात सर्वसामान्यांचे दिवाळं तर चोरट्यांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:38 IST

Robbery Case :दोन वर्षात ५५.४४ कोटीच्या मुद्देमालावर डल्ला

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : कोरोनामुळे नोकरी, उद्योगांवर कोसळलेल्या कुऱ्हाडीमुळे सर्वसामान्यांचे दिवाळे निघाले असतानाच, चोरट्यांची मात्र चांदी झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या कोरोना काळातल्या दोन वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ५५ कोटी ४४ लाखाच्या मुद्देमालावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. त्यापैकी १९ कोटी ३५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, उर्वरित ३६ कोटी ८ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी फस्त केला आहे.

नवी मुंबईत वाढती गुन्हेगारी पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण करत आहे. शहरात चोरी, घरफोडी, जबरी लूट, सोनसाखळी चोरी अशा घटना दिवसेंदिवस घडत आहेत. त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरटे पळवत आहेत. त्यात नवी मुंबईतल्या गुन्हेगारांसह शहराबाहेरील टोळ्या सक्रिय आहेत. अनेकदा अशा टोळ्यांच्या मुक्ष्या आवळून पोलीस गुन्हा उघड देखील करतात. मात्र गुन्हेगार हाती लागूनही त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल पुन्हा हस्तगत करण्यात पुरेशे यश मिळत नाही. यामुळे गुन्हेगारांचे शिकार बनलेल्या सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडत असते. त्यातच २०२० मध्ये देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काहींच्या उद्योग व्यवसायाला कायमचे टाळे लागले, तर काहींना नोकरी गमवावी लागली. यामुळे आलेल्या नैराश्यातून काहींनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना नवी मुंबईसह पनवेल परिसरात घडल्या आहेत.

मात्र कोरोनामुळे सर्वसामान्य जरी होरपळला असला तरी, चोरट्यांची मात्र या कालावधीत देखील चांदी झाल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही वेगवेगळ्या गुन्ह्यात नवी मुंबईसह पनवेल, उरण मधून तब्बल २५ कोटी १८ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी पळवला होता. त्यानंतर २०२१ मध्ये सर्वसामान्यांची गाडी रुळावर येत असतानाच चोरटयांनी देखील गुन्ह्यांचा सपाटा लावला होता. त्यामुळे गतवर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ३० कोटी २५ लाखाच्या ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. 

२०१९ मध्ये चोरटयांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून २२६० गुन्ह्यात तब्बल २८ कोटी ९२ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी लुटला होता. मात्र कोरोनामुळे २०२० मध्ये देखील चोरट्यांकडून हातसफाई सुरु असतानाच २०२१ मध्ये देखील २२६८ गुन्ह्यात तब्बल ३० कोटी २५ लाखाचा ऐवज लुटला आहे.

मुद्देमालाशी संबंधित गुन्ह्यांची उकल करून त्यामधील ऐवज हस्तगत करण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत. गुन्हा उघड होण्यास विलंब झाल्यास, त्या कालावधीत गुन्हेगारांकडून त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली जाते. परिणामी त्या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागत नाही. यामुळेच २०१९ मध्ये ३१.८७ टक्के, २०२० मध्ये ४२.४४ टक्के तर २०२१ मध्ये केवळ २८.६५ टक्के मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

मालमत्तेचे गुन्हे     -             २०२१             २०२०               २०१९चोरीला गेला मुद्देमाल - ३०,२५,६३,००६ - २५,१८,३९,२७८ - २८,९२,६२,४३५हस्तगत केला मुद्देमाल - ८,६६,७७,०६१  - १०,६९,२१,२५१ - ९,२२,०१,७३२चोरटयांनी फस्त केला - २१,५८,८५,९४५ - १४,४९,१८,०२७ - १९,७०,६०,७०३

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसRobberyचोरीcorona virusकोरोना वायरस बातम्या