शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

न्यायालयाने तो आदेश दिल्यानं आम्ही कारवाई करु शकत नाही; पोलीस अधिक्षकांचं स्पष्टीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 19:43 IST

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली. 

गेल्या काही दिवसांआधी जुळ्या बहिणींनी एकाच युवकाशी लग्न केल्याची मोठी चर्चा झालेली पाहायला मिळाली. सोलापूरच्या अतुल आवताडे या तरुणाने एकाच मांडवात दोन सख्या जुळ्या बहिणींसोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर एकाचवेळी २ मुलींशी लग्न केल्याप्रकरणी नवरदेव अतुल अवताडे  चांगलाच अडचणीत आला.

अकलूज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हे प्रकरण नेले. मात्र आता सोलापूर न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे अतुलला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबाबत आज सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली. 

जुळ्या बहिणींशी लग्न केल्यानं पोलिसांत तक्रार दाखल; तरुणावर कारवाई होणार?, जाणून घ्या...!

अतुलविरोधात दाखल झालेल्या तक्रारींनूसार पोलिसांनी न्यायालयात तपास करण्याची परवानगी मागितली असता, न्यायालयाने अदखलपात्र गुन्ह्यात तपास करता येत नाही असे आदेश दिले, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. न्यायालयात यावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पीडित कोण आहे?, असे विचारले. कारण तक्रार करणारा हा पीडित नव्हता. जुळ्या बहिणींपैकी कोणी असेल किंवा संबंधित लग्न करणाऱ्याचे पाहिले लग्न झाले असेल आणि पहिल्या बायकोने तक्रार दिली असेल तर तपास करा, असा आदेश न्यायालयाने दिल्याचं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं. 

अतुल अवताडेने पहिले लग्न केले असेल तर पहिल्या पीडित पत्नीने संबंधित पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी. त्यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून, आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास करू, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सध्यातरी अतुल आणि जुळ्या बहिणींना दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

नेमकं प्रकरण काय?

जन्म, बालपण, शिक्षणच काय, तर नोकरीही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींची ही आयुष्याची गोष्ट. दोघींना एकमेकींची इतकी सवय लागली की, त्या एकमेकींशिवाय राहणे कठीण बनले होते. इतकेच काय, तर एकमेकींची आवड- निवडही एकसारख्याच झाल्या होत्या. कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित असून आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी. वडिलांच्या पश्चात आईसोबत राहत होत्या. 

सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने तिघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिघींच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचे प्रेम हे अतुलबरोबर जडले, पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होऊन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्नSolapurसोलापूरPoliceपोलिस