शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

घटस्फोटानंतर युवकानं केले दुसरं लग्न; पहिल्या पत्नीने पुन्हा साधली जवळीक, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 21:02 IST

लग्नानंतर काही महिने सुरळीत चालले होते. सर्व माझी काळजी घेत होते परंतु वेळेसोबत परिस्थिती बदलली

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाचं १४ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला २ मुलेही होती परंतु काही कारणानं पती पत्नीत वाद झाला आणि दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला. या युवकाने दुसरं लग्न केले मात्र त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे दुसऱ्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाणे गाठले. 

युवकाच्या दुसऱ्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्यात लग्नावेळी सासरच्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला आणि आता ५ लाख रुपये आणि बुलेटची मागणी करत आहेत. इतकेच नाही तर माझ्या भावाच्या लग्नातही मला जाऊ दिले नाही. माझ्याकडील दागिने काढून घेतले. त्याशिवाय पहिल्या पत्नीसोबत सामंजस्याने राहण्यासाठी मला मारहाण केली जाते. माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप तिने केला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.

माझे पती राजीव तिवारी यांचं १४ वर्षापूर्वी कविता नावाच्या युवतीसोबत लग्न झाले होते. त्या दोघांना १३ आणि ८ वर्षाचा मुलगा आहे. मात्र दोघांमध्ये झालेल्या वादानंतर सहमतीने घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर राजीव यांच्या कुटुंबाने नातेवाईकांच्या मध्यस्थीने आमचे लग्न लावून दिले. राजीव यांचं पहिलं लग्न झाले होते परंतु घटस्फोट झाल्याने आम्ही लग्नाला तयार झालो. २३ एप्रिल २०२४ रोजी लग्न धूमधामपणे करण्यात आले. माझ्या आनंदासाठी वडिलांनी जमीन विकून २५ लाखाहून अधिक खर्च लग्नात केला. हुंडा दिला जेणेकरून मला सासरी त्रास होऊ नये असं पूजा तिवारीने पोलिसांना सांगितले.

लग्नानंतर काही महिने सुरळीत चालले होते. सर्व माझी काळजी घेत होते परंतु वेळेसोबत परिस्थिती बदलली. राजीव यांची पहिली पत्नी कविताने माझ्या पतीशी पुन्हा जवळीक साधली. मुलांना भेटण्याच्या बहाण्याने ती वारंवार घरी येत होती. मी जेव्हा याचा विरोध केला तेव्हा पतीने मलाच शिवीगाळ केली, त्याबाबत सासरी तक्रार केली तर सर्वच नाराज झाले. एकेदिवशी सासूसासरे, दिर, पती आणि त्याची पहिली पत्नी कविता यांनी मिळून मला मारहाण केली. जर तू विरोध केला तर तुला घरातून काढून टाकू अशी धमकी पूजाला दिली. २२ नोव्हेंबरला पूजाच्या भावाचं लग्न होते त्या कार्यक्रमालाही घरच्यांनी जाऊन दिले नाही. मला ५ लाख रुपये आणि एक बुलेट मागितली असा आरोप दुसऱ्या पत्नीने केला. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.