शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चेटकीण असल्याच्या संशयावरून कुणी आजारी पडलं तर करत बेदम मारहाण, आता जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:42 IST

Burned alive : काही लोकांनी चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जिवंत जाळले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे.

बिहारमधील नवादा येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. काही लोकांनी चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जिवंत जाळले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नवादा येथील बंडखोर राजौली येथील आहे, जिथे महिलेला चेटकीण म्हणत तिचा सतत छळ केला जात होता. गावात कुणी आजारी पडलं तर महिलेला बेदम मारहाण केली जायची.गुरुवारी काही लोकांनी सर्व मर्यादा ओलांडत महिलेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. या घटनेनंतर महिलेने कसा तरी जीव वाचवण्यासाठी जवळच्या तलावात उडी मारली, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. मृतदेह बाहेर काढण्यासाठी नातेवाईक तलावात गेले असता लोकांनी त्यांनाही मारहाण केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस गावात तळ ठोकून आहेत. मृत महिलेची बहीण आणि भावजय यांनी राजौली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.रिपोर्टनुसार, गावात कोणी आजारी पडल्यानंतर महिलेवर अत्याचार करण्यात आला. जेव्हा कधी कोणाची तब्येत बिघडायची तेव्हा लोक त्या मृत महिलेला त्रास देत असत. घटनेची संवेदनशीलता पाहून पोलीसही आता कारवाई करत आहेत आणि संपूर्ण पोलीस फौजफाट्यासह जंगलाच्या मध्यभागी वसलेल्या गावात पोहोचले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस