शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

चेटकीण असल्याच्या संशयावरून कुणी आजारी पडलं तर करत बेदम मारहाण, आता जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:42 IST

Burned alive : काही लोकांनी चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जिवंत जाळले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे.

बिहारमधील नवादा येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. काही लोकांनी चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जिवंत जाळले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नवादा येथील बंडखोर राजौली येथील आहे, जिथे महिलेला चेटकीण म्हणत तिचा सतत छळ केला जात होता. गावात कुणी आजारी पडलं तर महिलेला बेदम मारहाण केली जायची.गुरुवारी काही लोकांनी सर्व मर्यादा ओलांडत महिलेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. या घटनेनंतर महिलेने कसा तरी जीव वाचवण्यासाठी जवळच्या तलावात उडी मारली, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. मृतदेह बाहेर काढण्यासाठी नातेवाईक तलावात गेले असता लोकांनी त्यांनाही मारहाण केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस गावात तळ ठोकून आहेत. मृत महिलेची बहीण आणि भावजय यांनी राजौली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.रिपोर्टनुसार, गावात कोणी आजारी पडल्यानंतर महिलेवर अत्याचार करण्यात आला. जेव्हा कधी कोणाची तब्येत बिघडायची तेव्हा लोक त्या मृत महिलेला त्रास देत असत. घटनेची संवेदनशीलता पाहून पोलीसही आता कारवाई करत आहेत आणि संपूर्ण पोलीस फौजफाट्यासह जंगलाच्या मध्यभागी वसलेल्या गावात पोहोचले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस