शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 10:24 IST

इटावा येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे. 

इटावा - उत्तर प्रदेशातील इटावा इथं एका सराफा व्यावसायिकाने पत्नी आणि ३ मुलांना विष देऊन ठार केले त्यानंतर चौघांच्या मृतदेहासोबत सेल्फी घेत सर्वकाही संपलं असा स्टेटस ठेवला. पत्नी आणि मुलांचे मृतदेह घरात ठेवून तो सुसाइड करण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला मात्र त्याला पोलिसांनी अटक केलं. इटावाच्या कोतवाली परिसरातील लालपुरा येथील ही घटना आहे. याठिकाणी सराफा व्यावसायिकाने पत्नी रेखा, मोठी मुलगी भाव्या, छोटी मुलगी काव्या आणि मुलाला आधी विष देऊन ठार केले. 

पत्नी आणि मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी मुकेश वर्मा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ पोहचला. त्याठिकाणी रेल्वे रुळावर तो झोपला. थोड्यावेळात तिथे मरुधर एक्सप्रेस ट्रेन गेली मात्र त्याला काही झाले नाही. त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांनी पकडले. एकाच वेळी ४ लोकांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ माजली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस घटनास्थळी पोहचले. मृत महिलेच्या मोठ्या भावाने आणि मुलांचा मामा सत्येंद्र सोनी यांनी सांगितले की, या घटनेबाबत मुकेश वर्मा खुलासा करू शकतात. त्याने असे का केले, कुटुंबात कुठलाही वाद नव्हता. मुकेशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. एक मुलगा पहिल्या बायकोचा आहे. 

दरम्यान, मुकेश वर्मा सराफा व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांच्या पहिल्या पत्नीचं २००५ साली निधन झाले, त्यानंतर मुकेश यांनी दुसरं लग्न केले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा ४ मृतदेह आढळले. त्यात पत्नी, २ मुली आणि एका मुलाचा समावेश होता. मुकेश वर्माला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तो रेल्वे स्टेशनवर आत्महत्येसाठी गेला होता. प्राथमिक तपासात मुकेश वर्माचे घरगुती वाद सुरू होते. कौटुंबिक वादातून तणावात येत या सर्वांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. मृतकांच्या गळ्याभोवती काही खूणा आढळत आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून नेमकं यामागचं कारण काय हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांनी दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी