शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांचा आर्थिक स्वार्थ कसा जागा झाला? विद्यार्थ्याचे अपहरण, रोजच एकत्र असायची उठबस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:26 IST

वाशी सेक्टर १० परिसरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याचे त्याच्याच मित्रांनी अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

नवी मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पोलिसांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असून, नेहमीच्या उठण्या-बसण्यातले आहेत. यामुळे त्या रात्री नेमके असे काय घडले, ज्यामध्ये त्यांनी मित्राचे अपहरण करून त्याला सिगारेटचे चटके दिले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

वाशी सेक्टर १० परिसरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याचे त्याच्याच मित्रांनी अपहरण करून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात इतरही काहींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. हे सर्वजण १८ ते २० वयोगटातील असून, त्यात काही अल्पवयीन देखील आहेत. 

कुटुंबीयांचे नियंत्रण नव्हते का? तक्रारदार व गुन्हा दाखल असलेले सर्वजण विद्यार्थी असून, त्यांची नेहमीची एकत्र उठबस असायची. त्यापैकी बहुतेक जण अनेकदा मध्यरात्री घरातून बाहेर येऊन एकत्र फिरत असत. यामुळे कुटुंबीयांचे देखील त्यांच्यावर नियंत्रण नव्हते का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. 

 तक्रारदार मुलाचे वडील विद्युत कामाचे ठेकेदार आहेत. यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे असावेत असा त्यांचा समज झाला होता का? की इतर कोणत्या वादाचे कारण त्यामागे आहे? यादृष्टीने तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस