शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:19 IST

केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ असलेल्या मुनार येथे १९ वर्षांपूर्वी सेम टू सेम अशीच धक्कादायक घटना घडली.

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी मेरठच्या मुस्कानने तिचा पती सौरभची बॉयफ्रेंड साहिलच्या मदतीने हत्या केली. नंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये ठेवले. अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना आता समोर आली आहे. केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ असलेल्या मुनार येथे १९ वर्षांपूर्वी सेम टू सेम अशीच धक्कादायक घटना घडली.

पम्मल परिसरातील अनंतरामन लग्नाच्या नऊ दिवसांनी पत्नी विद्यालक्ष्मीसोबत हनिमूनला गेला होता. दोघेही चेन्नईहून त्रिशूरला ट्रेनने गेले. त्यानंतर गुरुवायूर मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर दोघेही मुनारला टॅक्सीने गेले आणि एका आलिशान रिसॉर्टमध्ये राहिले. दुसऱ्या दिवशी ते प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडला धरणावर पोहोचले, जिथे विद्यालक्ष्मी तिचा पती अनंतला एका निर्जन भागात घेऊन गेली. त्यानंतर अचानक ती रस्त्यावर ओरडत आली आणि टॅक्सी चालकाला सांगितलं की दोन लोकांनी तिच्या पतीची हत्या केली आहे आणि दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले आहेत. चालकाने ताबडतोब पोलिसांना फोन केला.

ऑटो चालकाने पोलिसांना दिली माहिती

आनंद आणि अंबुराज हे दोन तरुण कुंडला धरणा येऊन ऑटोने हॉटेल अराफासाठी निघाले. ते खूप घाबरलेले दिसत होते. त्यांनी ऑटो चालकाला सांगितलं की त्यांना लवकरात लवकर मुनारमधून बाहेर पडायचं आहे. पण हॉटेलमध्ये पोहोचताच ऑटो चालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं, जिथे विद्यालक्ष्मी आधीच उपस्थित होती, जी तिच्या पतीच्या हत्येची तक्रार नोंदवण्यासाठी आली होती. तिला कल्पना नव्हती की ज्या लोकांनी तिच्या पतीची हत्या केली आहे ते तिच्यासमोर येतील.

आनंद आणि विद्यालक्ष्मी होते प्रेमात

काही वेळातच हनिमून आणि हत्या प्रकरणाचा संपूर्ण प्लॅन समोर आला. विद्यालक्ष्मीने तिचा प्रियकर आनंद द्वारे तिच्या पतीची हत्या केली होती. तपासात असं समोर आलं की, आनंद आणि विद्यालक्ष्मी प्रेमात होते आणि ते चेन्नईमध्ये लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. पण आनंद गरीब होता आणि त्याची जात देखील विद्यालक्ष्मीपेक्षा वेगळी होती. म्हणूनच तिने अनंतरामनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून नंतर त्याला आपल्या मार्गातून बाजुला काढता येईल.

पतीच्या मोबाईलद्वारे प्रियकर आनंदशी संपर्कात

विद्यालक्ष्मी खूप हुशार होती आणि हनिमून दरम्यान तिच्या पतीच्या मोबाईलद्वारे तिचा प्रियकर आनंदशी संपर्कात होती. आनंद आणि अंबुराज एकाच ट्रेनमध्ये चढून मुनार येथे पोहोचले होते, जिथे विवाहित कपल देखील उपस्थित होते. ते दोघेही गुरुवायूर मंदिरापर्यंत त्यांचा पाठलाग करत होते. पण त्यांना रिसॉर्टमध्ये खोली न मिळाल्याने ते जवळच्या अराफा हॉटेलमध्ये राहिले. त्यानंतर कुंडला धरणाजवळ संधी मिळताच दोघांनीही अनंतरामनचा गळा दाबून खून केला. २००६ मध्ये घडलेल्या या भयंकर प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळmarriageलग्नPoliceपोलिस