शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:19 IST

केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ असलेल्या मुनार येथे १९ वर्षांपूर्वी सेम टू सेम अशीच धक्कादायक घटना घडली.

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी मेरठच्या मुस्कानने तिचा पती सौरभची बॉयफ्रेंड साहिलच्या मदतीने हत्या केली. नंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये ठेवले. अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना आता समोर आली आहे. केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ असलेल्या मुनार येथे १९ वर्षांपूर्वी सेम टू सेम अशीच धक्कादायक घटना घडली.

पम्मल परिसरातील अनंतरामन लग्नाच्या नऊ दिवसांनी पत्नी विद्यालक्ष्मीसोबत हनिमूनला गेला होता. दोघेही चेन्नईहून त्रिशूरला ट्रेनने गेले. त्यानंतर गुरुवायूर मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर दोघेही मुनारला टॅक्सीने गेले आणि एका आलिशान रिसॉर्टमध्ये राहिले. दुसऱ्या दिवशी ते प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडला धरणावर पोहोचले, जिथे विद्यालक्ष्मी तिचा पती अनंतला एका निर्जन भागात घेऊन गेली. त्यानंतर अचानक ती रस्त्यावर ओरडत आली आणि टॅक्सी चालकाला सांगितलं की दोन लोकांनी तिच्या पतीची हत्या केली आहे आणि दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले आहेत. चालकाने ताबडतोब पोलिसांना फोन केला.

ऑटो चालकाने पोलिसांना दिली माहिती

आनंद आणि अंबुराज हे दोन तरुण कुंडला धरणा येऊन ऑटोने हॉटेल अराफासाठी निघाले. ते खूप घाबरलेले दिसत होते. त्यांनी ऑटो चालकाला सांगितलं की त्यांना लवकरात लवकर मुनारमधून बाहेर पडायचं आहे. पण हॉटेलमध्ये पोहोचताच ऑटो चालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं, जिथे विद्यालक्ष्मी आधीच उपस्थित होती, जी तिच्या पतीच्या हत्येची तक्रार नोंदवण्यासाठी आली होती. तिला कल्पना नव्हती की ज्या लोकांनी तिच्या पतीची हत्या केली आहे ते तिच्यासमोर येतील.

आनंद आणि विद्यालक्ष्मी होते प्रेमात

काही वेळातच हनिमून आणि हत्या प्रकरणाचा संपूर्ण प्लॅन समोर आला. विद्यालक्ष्मीने तिचा प्रियकर आनंद द्वारे तिच्या पतीची हत्या केली होती. तपासात असं समोर आलं की, आनंद आणि विद्यालक्ष्मी प्रेमात होते आणि ते चेन्नईमध्ये लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. पण आनंद गरीब होता आणि त्याची जात देखील विद्यालक्ष्मीपेक्षा वेगळी होती. म्हणूनच तिने अनंतरामनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून नंतर त्याला आपल्या मार्गातून बाजुला काढता येईल.

पतीच्या मोबाईलद्वारे प्रियकर आनंदशी संपर्कात

विद्यालक्ष्मी खूप हुशार होती आणि हनिमून दरम्यान तिच्या पतीच्या मोबाईलद्वारे तिचा प्रियकर आनंदशी संपर्कात होती. आनंद आणि अंबुराज एकाच ट्रेनमध्ये चढून मुनार येथे पोहोचले होते, जिथे विवाहित कपल देखील उपस्थित होते. ते दोघेही गुरुवायूर मंदिरापर्यंत त्यांचा पाठलाग करत होते. पण त्यांना रिसॉर्टमध्ये खोली न मिळाल्याने ते जवळच्या अराफा हॉटेलमध्ये राहिले. त्यानंतर कुंडला धरणाजवळ संधी मिळताच दोघांनीही अनंतरामनचा गळा दाबून खून केला. २००६ मध्ये घडलेल्या या भयंकर प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळmarriageलग्नPoliceपोलिस