शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:57 IST

Crime UP : पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर सापाने चावा घेतल्याचा बहाणा करून तो रुग्णालयात दाखल झाला.

बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर सापाने चावा घेतल्याचा बहाणा करून तो रुग्णालयात दाखल झाला. मात्र, त्याच्या दोन दिव्यांग मुलींनी केलेल्या इशाऱ्यांमुळे हे क्रूर सत्य उघडकीस आले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सदर घटना परसविगहा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुल्तानी गावात घडली. लग्नाला १२ वर्षे झाली असताना एका नराधम पतीने पाच मुलांच्या आई असलेल्या आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पती रंजन दास याला अटक केली आहे.

परसविगहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रिंकी देवी (३४) हिच्या भावाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत महिलेचा भाऊ बबलू कुमार याने सांगितले की, २०१३ मध्ये रिंकीचे लग्न रंजन दाससोबत झाले होते. त्यांना पाच मुले असून, त्यापैकी दोन मुली बोलू शकत नाहीत.

अनावश्यक खर्चातून वाद

बबलू कुमारने पुढे सांगितले की, "माझ्या बहिणीचा पती रंजन दास हा मजुरी करतो, पण तो खाण्या-पिण्यात खूप पैसे उधळत असे. माझी बहीण त्याच्या या अनावश्यक खर्चाला विरोध करत होती. गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नकोस, असा ती त्याला सल्ला देत होती. याच कारणावरून दोघांमध्ये रोज भांडणे होत होती."

आईची हत्या, मुलींनी सांगितली कहाणी

काही दिवसांपासून रिंकी भांडणांना कंटाळून माहेरी शंकरगंज येथे राहत होती. गुरुवारी रंजन तिला समजावून पुन्हा घरी घेऊन गेला. पण रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि रंजनने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रिंकीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर बबलू तिच्या घरी पोहोचला. तिथे त्याच्या दोन दिव्यांग भाच्यांनी खुणा करून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी रंजनचा शोध सुरू केला, पण तो कुठेही सापडला नाही, त्याचे कुटुंबीयही पळून गेले होते.

साप चावल्याचा बनाव उघड

बबलू कुमार म्हणाला, "आम्हाला नंतर समजले की रंजनने सापाने चावा घेतल्याचा बनाव करून स्वतःला रुग्णालयात दाखल केले आहे. आम्ही लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयातून त्याला अटक केली." पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत सापाने चावा घेतल्याचे प्रकरण संशयास्पद वाटत आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार