शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या त्रासामुळे त्याने केली पाच जणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 08:38 IST

सहा अटकेत : शेतात पुरले होते मृतदेह

ठळक मुद्देदेवास जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या नेमावरमध्ये एका शेतात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जमीन खोदून पाच मृतदेह ताब्यात घेतले. हे पाचही जण गेल्या १३ मेपासून बेपत्ता होते.

देवास (मध्य प्रदेश) : देवास जिल्ह्यात पाच जणांची हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरल्याचा प्रकार उघड झाला असून, आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. आपल्या प्रेयसीमुळे त्रासून जाऊन सुरेंद्र चौहान नावाच्या व्यक्तीने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे हत्याकांड केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. 

देवास जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या नेमावरमध्ये एका शेतात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जमीन खोदून पाच मृतदेह ताब्यात घेतले. हे पाचही जण गेल्या १३ मेपासून बेपत्ता होते. पोलीस त्यांचा सतत शोध घेत होते. बेपत्ता झालेल्यांत एक महिला, तीन युवती आणि एका युवकाचा समावेश होता. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी तपास केल्यावर एकेक करून त्यांनी हत्याकांडाशी संबंधित पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेला रस्त्यावर सुरेंद्र चौहानच्या शेतात खड्ड्यात पुरलेले पाचही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने जवळपास दहा फूट खोदकाम करून मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस या हत्याकांडाचा संबंध शेताचा मालक सुरेंद्र याच्याशी जोडून तपास करीत आहेत. सुरेंद्र याचे एका युवतीशी प्रेम प्रकरण सुरू होते व त्यातून हे भीषण हत्याकांड केले गेले.

साथीदारांची घेतली मदत मृतदेह ममता मोहनलाल कास्ते (४५), रूपाली मोहनलाल (२१), दिव्या मोहनलाल (१४) पूजा रवी ओसवाल (१५), पवन रवि ओसवाल (१४) यांचे आहेत. पोलिसांनी सहा आरोपींची चौकशी केल्यावर मुख्य आरोपी सुरेंद्र याने त्याच्या प्रेयसीमुळे त्रासून जाऊन साथीदारांच्या मदतीने कुटुंबाची हत्या केली, असे उघड झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस