शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रेयसीच्या त्रासामुळे त्याने केली पाच जणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 08:38 IST

सहा अटकेत : शेतात पुरले होते मृतदेह

ठळक मुद्देदेवास जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या नेमावरमध्ये एका शेतात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जमीन खोदून पाच मृतदेह ताब्यात घेतले. हे पाचही जण गेल्या १३ मेपासून बेपत्ता होते.

देवास (मध्य प्रदेश) : देवास जिल्ह्यात पाच जणांची हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरल्याचा प्रकार उघड झाला असून, आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. आपल्या प्रेयसीमुळे त्रासून जाऊन सुरेंद्र चौहान नावाच्या व्यक्तीने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे हत्याकांड केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. 

देवास जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या नेमावरमध्ये एका शेतात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जमीन खोदून पाच मृतदेह ताब्यात घेतले. हे पाचही जण गेल्या १३ मेपासून बेपत्ता होते. पोलीस त्यांचा सतत शोध घेत होते. बेपत्ता झालेल्यांत एक महिला, तीन युवती आणि एका युवकाचा समावेश होता. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी तपास केल्यावर एकेक करून त्यांनी हत्याकांडाशी संबंधित पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेला रस्त्यावर सुरेंद्र चौहानच्या शेतात खड्ड्यात पुरलेले पाचही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने जवळपास दहा फूट खोदकाम करून मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस या हत्याकांडाचा संबंध शेताचा मालक सुरेंद्र याच्याशी जोडून तपास करीत आहेत. सुरेंद्र याचे एका युवतीशी प्रेम प्रकरण सुरू होते व त्यातून हे भीषण हत्याकांड केले गेले.

साथीदारांची घेतली मदत मृतदेह ममता मोहनलाल कास्ते (४५), रूपाली मोहनलाल (२१), दिव्या मोहनलाल (१४) पूजा रवी ओसवाल (१५), पवन रवि ओसवाल (१४) यांचे आहेत. पोलिसांनी सहा आरोपींची चौकशी केल्यावर मुख्य आरोपी सुरेंद्र याने त्याच्या प्रेयसीमुळे त्रासून जाऊन साथीदारांच्या मदतीने कुटुंबाची हत्या केली, असे उघड झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस