शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बोंबला! लग्नानंतर नवरीला घरी घेऊन जात होता नवरदेव, रस्त्यात तिचा चेहरा पाहिला अन् बसला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 16:38 IST

Fake Marriage News : ही घटना हरयाणातील आहे. हरयाणाच्या नांगल चौधरी येथील फूलचंद गुर्जरने फेब्रुवारीला यासंबंधी तक्रार पोलिसात दिली होती. त्यात सांगितलं होतं की, ४ लोकांनी त्याचं खोटं लग्न लावून दिलं.

Fake Marriage News : पूर्व राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यात लग्नाच्या नावावर एका तरूणाची फसवणूक करण्यात आली आहे. इथे खोटं लग्न लावून देणाऱ्या गॅंगने एका तरूणाकडून ७ लाख रूपये घेऊन दुसऱ्याच तरूणीसोबत त्याचं लग्न लावून दिलं. लग्न झाल्यावर घरी जाताना नवरदेवाला संशय आल्याने याचा भांडाफोड झाला. त्याला संशय आला आणि त्याने नवरीच्या डोक्यावरील पदर उचलून पाहिला तर त्याला धक्काच बसला.

लग्न झाल्यावर सत्य आलं समोर

नवरीचा चेहरा पाहिल्यावर त्याने लग्न लावून देणाऱ्या लोकांना संपर्क केला. ते घटनास्थळी आले आणि नवरदेवाने दिलेल्या ७ लाखांपैकी अर्धे रूपये त्याला परत दिले आणि नवरीला तेथून सोबत घेऊन गेले. त्यानंतर नवरदेवाने पोलिसांकडे धाव घेतली. नंतर पोलिसांनी चौकशी केली आणि खोट्या नवरीसह चार लोकांना अटक केली.

ही घटना हरयाणातील आहे. हरयाणाच्या नांगल चौधरी येथील फूलचंद गुर्जरने फेब्रुवारीला यासंबंधी तक्रार पोलिसात दिली होती. त्यात सांगितलं होतं की, ४ लोकांनी त्याचं खोटं लग्न लावून दिलं आणि ७ लाख रूपये घेऊन फसवणूक केली. त्याने सांगितलं की, रवि धोबी नावाच्या एका व्यक्तीने एका तरूणीसोबत त्याचं लग्न जुळवलं होतं. त्या बदल्यात त्याने ७ लाख रूपये घेतले होते.

नवरीचा चेहरा पाहिला अन्....

फूलचंदचा आरोप आहे की, आरोपींनी तरूणाचं लग्न तर लावून दिलं. पण नवरी बदलली. आधी जी मुलगी दाखवली गेली होती तिच्यासोबत लग्न लावून दिलं नाही. दुसऱ्याच मुलीसोबत त्याचं लग्न लावलं. जेव्हा ते लग्न करून परत होते तेव्हा रस्त्यात नवरदेवाला नवरीवर संशय आला. त्यामुळे त्याने नवरीच्या डोक्यावरील पदर उचलून पाहिला आणि त्याला धक्का बसला. कारण ती आधी पाहिली ती मुलगी नव्हती. दुसरीच मुलगी होती. आरोपींनी ज्या मुलीसोबत लग्न लावून दिलं तिची नाव नेहा आहे. ती दिल्लीच्या पंजाबी बाग भागातील आहे.

काही पैसे परत देऊन, नवरीला घेऊन गेले

पोलिसांनी सांगितलं की, यावर फूलचंद आणि नवरदेवाने लग्न लावणाऱ्या दलालांना फोन केला. त्यानंतर ते लोक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पक्षात तिथे वाद झाला. त्यानंतर लग्न लावून देणाऱ्या लोकांनी फूलचंद आणि नवरदेवावर काही पैसे फेकले. त्यानंतर नवरीला आपल्या सोबत परत घेऊन गेले. तेव्हा फसवणूक झाल्याची जाणीव नवरदेवाला झाली. अशात ते पोलिसांकडे गेले.

नवरीसहीत चौघांना अटक

तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली आणि चार आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून १४ फेब्रुवारीला अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली जात आहे. ही गॅंग अनेकांचं खोटं लावून देत त्यांची फसवणूक करीत होती. त्यांना अनेकांकडून लाखो रूपये लुटले आहेत. 

टॅग्स :HaryanaहरयाणाRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न