शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

Video - मंत्र्याच्या पुतण्याची दादागिरी! हॉटेलमध्ये तोडफोड, दारूच्या नशेत कर्मचाऱ्यांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:08 IST

हॉटेल मालक अभिमन्यू सिंहचे वडील भवानी सिंग यांच्या तक्रारीवरून वैशाली नगर पोलीस ठाण्यात बुधवारी हर्षदीप खाचरियावास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांचा पुतण्या हर्षदीप सिंह खाचरियावास याने जयपूरमधील हॉटेलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हर्षदीपने कर्मचाऱ्यांसह हॉटेलच्या गेस्टला देखील मारहाण केली. ही घटना जयपूरमधील वैशाली नगरची आहे. हॉटेल मालक अभिमन्यू सिंहचे वडील भवानी सिंग यांच्या तक्रारीवरून वैशाली नगर पोलीस ठाण्यात बुधवारी हर्षदीप खाचरियावास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल मालक अभिमन्यूने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास हर्षदीप सिंह खाचरियावास त्याच्या काही मित्रांसह हॉटेलमध्ये आला होता. याच दरम्यान हॉटेलमध्ये आलेल्या गेस्टसोबत हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांची बाचाबाची झाली. काही वेळाने गेस्ट त्यांच्या खोलीत गेले असता हर्षदीपने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा रूम नंबर विचारला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी नंबर देण्यास नकार दिल्याने हर्षदीपने तोडफोड करण्यास सुरुवात केली. याबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

तोडफोडीच्या वेळी गोंधळ वाढल्यावर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील इतर गेस्ट लॉबीमध्ये आले. याच दरम्यान हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांनी गेस्ट आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांसमोरच मारहाण केली. पोलिसांनी गेस्ट आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी दारूच्या नशेत असलेल्या हर्षदीप आणि त्याच्या मित्रांचा गोंधळ सुरूच होती. पोलीस गेस्टला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ लागले तेव्हा त्यांनी बाहेर येऊन त्याला बेदम मारहाण केली.

हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलच्या सर्व्हर रूममध्ये घुसून सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या मुलाला मारहाण करण्यात आली. हॉटेल मालक अभिमन्यू सिंह सांगतात की, घटनेच्या वेळी हर्षदीपने मोबाईल नंबर घेऊन फोन केला होता. यावेळी त्याने आपण करण सिंह खाचरियावास यांचा मुलगा असल्याचे सांगितले. मी त्यांना बोलावू का? यावर अभिमन्यू म्हणाला की, हॉटेल फक्त तुमचेच आहे, मात्र तोडफोड करून मारामारी करणे योग्य नाही. यानंतर तो आपल्या साथीदारांसह हॉटेलमधून बाहेर पडला. 

हॉटेल मालक अभिमन्यूचे वडील भवानी सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, घटनेपासून हर्षदीप त्यांना आणि त्याचा मुलगा अभिमन्यूला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. फोन उचलणं बंद केल्यावर त्यांनी इतर नंबरवरून फोन केले आणि मुख्यमंत्र्यांनाही फोन न उचलण्याची हिंमत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी