शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Video - मंत्र्याच्या पुतण्याची दादागिरी! हॉटेलमध्ये तोडफोड, दारूच्या नशेत कर्मचाऱ्यांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:08 IST

हॉटेल मालक अभिमन्यू सिंहचे वडील भवानी सिंग यांच्या तक्रारीवरून वैशाली नगर पोलीस ठाण्यात बुधवारी हर्षदीप खाचरियावास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांचा पुतण्या हर्षदीप सिंह खाचरियावास याने जयपूरमधील हॉटेलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हर्षदीपने कर्मचाऱ्यांसह हॉटेलच्या गेस्टला देखील मारहाण केली. ही घटना जयपूरमधील वैशाली नगरची आहे. हॉटेल मालक अभिमन्यू सिंहचे वडील भवानी सिंग यांच्या तक्रारीवरून वैशाली नगर पोलीस ठाण्यात बुधवारी हर्षदीप खाचरियावास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल मालक अभिमन्यूने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास हर्षदीप सिंह खाचरियावास त्याच्या काही मित्रांसह हॉटेलमध्ये आला होता. याच दरम्यान हॉटेलमध्ये आलेल्या गेस्टसोबत हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांची बाचाबाची झाली. काही वेळाने गेस्ट त्यांच्या खोलीत गेले असता हर्षदीपने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा रूम नंबर विचारला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी नंबर देण्यास नकार दिल्याने हर्षदीपने तोडफोड करण्यास सुरुवात केली. याबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

तोडफोडीच्या वेळी गोंधळ वाढल्यावर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील इतर गेस्ट लॉबीमध्ये आले. याच दरम्यान हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांनी गेस्ट आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांसमोरच मारहाण केली. पोलिसांनी गेस्ट आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी दारूच्या नशेत असलेल्या हर्षदीप आणि त्याच्या मित्रांचा गोंधळ सुरूच होती. पोलीस गेस्टला पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ लागले तेव्हा त्यांनी बाहेर येऊन त्याला बेदम मारहाण केली.

हर्षदीप आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलच्या सर्व्हर रूममध्ये घुसून सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या मुलाला मारहाण करण्यात आली. हॉटेल मालक अभिमन्यू सिंह सांगतात की, घटनेच्या वेळी हर्षदीपने मोबाईल नंबर घेऊन फोन केला होता. यावेळी त्याने आपण करण सिंह खाचरियावास यांचा मुलगा असल्याचे सांगितले. मी त्यांना बोलावू का? यावर अभिमन्यू म्हणाला की, हॉटेल फक्त तुमचेच आहे, मात्र तोडफोड करून मारामारी करणे योग्य नाही. यानंतर तो आपल्या साथीदारांसह हॉटेलमधून बाहेर पडला. 

हॉटेल मालक अभिमन्यूचे वडील भवानी सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, घटनेपासून हर्षदीप त्यांना आणि त्याचा मुलगा अभिमन्यूला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. फोन उचलणं बंद केल्यावर त्यांनी इतर नंबरवरून फोन केले आणि मुख्यमंत्र्यांनाही फोन न उचलण्याची हिंमत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी