शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत गुन्हेगारांचेही पुनश्च हरिओम; ५,७९७ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 06:09 IST

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात लॉकडाऊनमधील एप्रिल आणि मे महिन्यांत १८ हत्या करण्यात आल्या.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये एप्रिल, मेदरम्यान रस्त्यावरील गुन्हेगारी कमी झाली होती; कारण सर्वच घरांत कैद होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आणि गुन्हेगारांनीही पुनश्च हरिओमचा राग आळवत आपले काम जोमाने सुरू केले. त्यामुळेच जून महिन्यात रस्त्यावरील गुन्हेगारीसंदर्भातील १,०२० गुन्ह्यांसह एकूण ५,७९७ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद झाली. एप्रिल आणि मे महिन्यांत मिळून जितके गुन्हे नोंदविण्यात आले तेवढे एकट्या जूनमध्ये घडले.

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात लॉकडाऊनमधील एप्रिल आणि मे महिन्यांत १८ हत्या करण्यात आल्या. यात फक्त एका महिलेचा समावेश आहे. गेल्या याच दोन महिन्यांत २७ हत्या घडल्या होत्या. महिन्यातील ४७ हत्येच्या प्रयत्नांच्या गुह्यांचे प्रमाण घटून २१ वर आले आहे. गंभीर दुखापतीच्या गुह्यांचे प्रमाणही एप्रिल महिन्यात निम्म्याहून खाली आले. शहरात दिवसाला दाखल होणाऱ्या बलात्काराच्या सरासरी तीन गुह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसांत एका गुह्यावर आले.

शहरात दर महिन्याला १५० हून अधिक घरफोडीच्या गुह्यांची नोंद होते. एखाद्या महिन्यात तर हा आकडा २०० पर्यंत पोहोचतो. मात्र लॉकडाऊनच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत घरफोडीचे एकूण ११५ गुन्हेच दाखल झाले. वाहन चोरीचे प्रमाणही कमी झाले. या दोन महिन्यांत अनुक्रमे ८४ आणि १५८ अशा एकूण २४२ गुन्ह्यांची नोंद झाली, तर दरोड्याचा एक आणि खंडणीचे आठ गुन्हे नोंदविले गेले.

मात्र जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हत्येच्या १३ घटना घडल्या. यापैकी १२ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. या काळात मुंबईतून तब्बल २३५ वाहने चोरीला गेली. यात जीवनावश्यक सामान तसेच भाजी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांच्या वाहनांचाही समावेश आहे. यापैकी अवघ्या ३१ वाहनांचा शोध पोलीस घेऊ शकले. या काळात घरफोडीचे तब्बल १०५ गुन्हे नोंद झाले. विनयभंगाच्या १०३, तर बलात्काराच्या ४६ गुह्यांची नोंद झाली.

मे महिन्यात घडलेल्या २,५३२ गुन्ह्यांपैकी रस्त्यावरील गुन्हेगारीचे ६५४ तर एप्रिलमध्ये दाखल ५,७०३ पैकी रस्त्यावरील गुन्हेगारीच्या ४२५ गुह्यांचा समावेश आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात आता सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यासह या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याचा ताणही पोलिसांवर आहे.

सांगा दरोडा घालणारच कसा?

लॉकडाऊनमुळे मुंबईकर घरात कैद झाले. मग अशावेळी घरफोडी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाल्याने चोरांनी घरफोडीकडे पाठ फिरवली. त्यामुळेच एप्रिल व जूनमध्ये एकही घरफोडी झाली नाही तर मे महिन्यात केवळ एकाच घरफोडीची नोंद आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी