शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबईत गुन्हेगारांचेही पुनश्च हरिओम; ५,७९७ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 06:09 IST

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात लॉकडाऊनमधील एप्रिल आणि मे महिन्यांत १८ हत्या करण्यात आल्या.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये एप्रिल, मेदरम्यान रस्त्यावरील गुन्हेगारी कमी झाली होती; कारण सर्वच घरांत कैद होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आणि गुन्हेगारांनीही पुनश्च हरिओमचा राग आळवत आपले काम जोमाने सुरू केले. त्यामुळेच जून महिन्यात रस्त्यावरील गुन्हेगारीसंदर्भातील १,०२० गुन्ह्यांसह एकूण ५,७९७ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद झाली. एप्रिल आणि मे महिन्यांत मिळून जितके गुन्हे नोंदविण्यात आले तेवढे एकट्या जूनमध्ये घडले.

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, शहरात लॉकडाऊनमधील एप्रिल आणि मे महिन्यांत १८ हत्या करण्यात आल्या. यात फक्त एका महिलेचा समावेश आहे. गेल्या याच दोन महिन्यांत २७ हत्या घडल्या होत्या. महिन्यातील ४७ हत्येच्या प्रयत्नांच्या गुह्यांचे प्रमाण घटून २१ वर आले आहे. गंभीर दुखापतीच्या गुह्यांचे प्रमाणही एप्रिल महिन्यात निम्म्याहून खाली आले. शहरात दिवसाला दाखल होणाऱ्या बलात्काराच्या सरासरी तीन गुह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसांत एका गुह्यावर आले.

शहरात दर महिन्याला १५० हून अधिक घरफोडीच्या गुह्यांची नोंद होते. एखाद्या महिन्यात तर हा आकडा २०० पर्यंत पोहोचतो. मात्र लॉकडाऊनच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत घरफोडीचे एकूण ११५ गुन्हेच दाखल झाले. वाहन चोरीचे प्रमाणही कमी झाले. या दोन महिन्यांत अनुक्रमे ८४ आणि १५८ अशा एकूण २४२ गुन्ह्यांची नोंद झाली, तर दरोड्याचा एक आणि खंडणीचे आठ गुन्हे नोंदविले गेले.

मात्र जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हत्येच्या १३ घटना घडल्या. यापैकी १२ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. या काळात मुंबईतून तब्बल २३५ वाहने चोरीला गेली. यात जीवनावश्यक सामान तसेच भाजी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांच्या वाहनांचाही समावेश आहे. यापैकी अवघ्या ३१ वाहनांचा शोध पोलीस घेऊ शकले. या काळात घरफोडीचे तब्बल १०५ गुन्हे नोंद झाले. विनयभंगाच्या १०३, तर बलात्काराच्या ४६ गुह्यांची नोंद झाली.

मे महिन्यात घडलेल्या २,५३२ गुन्ह्यांपैकी रस्त्यावरील गुन्हेगारीचे ६५४ तर एप्रिलमध्ये दाखल ५,७०३ पैकी रस्त्यावरील गुन्हेगारीच्या ४२५ गुह्यांचा समावेश आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात आता सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यासह या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याचा ताणही पोलिसांवर आहे.

सांगा दरोडा घालणारच कसा?

लॉकडाऊनमुळे मुंबईकर घरात कैद झाले. मग अशावेळी घरफोडी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाल्याने चोरांनी घरफोडीकडे पाठ फिरवली. त्यामुळेच एप्रिल व जूनमध्ये एकही घरफोडी झाली नाही तर मे महिन्यात केवळ एकाच घरफोडीची नोंद आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी