शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

“माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबाचे कोणीही काम केले नाही”

By प्रविण मरगळे | Updated: January 5, 2021 11:35 IST

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणारा शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला

ठळक मुद्देआत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंगने बाकोर पोलिस ठाण्यात फोन केला असता तपासात निष्पन्न झालं आहे.सरकारी कर्मचारी आपले काम करीत नाहीत त्यासाठी मी आत्महत्या करणार आहेबलवंतसिंगच्या खिशातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदार आणि महिसागरचे आमदाराचं नाव

महिसागर - कृषी कायद्याबाबत देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. याचवेळी गुजरातमधील महिसागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एका शेतकऱ्याने पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा शेतकरी वारंवार शासकीय मदतीसाठी पंचायत कार्यालयात चक्कर मारत होता. मात्र शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्याने तो नाराज होऊन हे टोकाचं पाऊल उचललं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणाऱ्या शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्याच्या घरी गोंधळ उडाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली असल्याचं समजलं आहे. ज्यात म्हटलं आहे की, “माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबांचे काम कोणी केले नाही.”

आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना लावला फोन

आत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंगने बाकोर पोलिस ठाण्यात फोन केला असता तपासात निष्पन्न झालं आहे. हा फोन पंचायत कार्यालयातून करण्यात आला होता. त्या वेळी शेतकर्‍याने पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले की सरकारी कर्मचारी आपले काम करीत नाहीत त्यासाठी मी आत्महत्या करणार आहे. मात्र पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असा आरोप आहे. त्याचा परिणाम शेतक्याने आपला जीव दिला.

सुसाईड नोटमध्ये खासदार-आमदाराच्या नावाचा उल्लेख  

आत्महत्या केलेल्या बलवंतसिंगच्या खिशातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदार आणि महिसागरचे आमदार जिग्नेश सेवक या दोघांची नावे लिहिली असल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: ही घटना अशावेळी घडली जेव्हा सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करत आहे

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, सेवकचा अर्थ सेवा देणे आहे परंतु असं सरकारी कार्यालयात होत नाही, मी एक गरीब माणूस आहे आणि वर्षानुवर्षे भाजपावर विश्वास ठेवतोय. माझ्या आत्म्यात भाजपा आहे. शेवटपर्यंत भाजपासोबत राहिलो. माझा मृत्यू झाला तरी मी भाजपावर विश्वास ठेवत राहीन. पक्षात अजूनही माझा आत्मा आहे, पण गरीब असल्याने मला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाने केला आरोप

बलवंतसिंग यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मुलगा राजेंद्रच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांनी स्वत:च्या जमिनीचा काही भाग विकून घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पाच वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेच्या मदतीसाठी अर्ज करत होते. या यादीत त्यांचे नावही आले, परंतु पंचायत कार्यालयाकडून त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही असा आरोप त्याने केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीBJPभाजपाPoliceपोलिस