शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

“माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबाचे कोणीही काम केले नाही”

By प्रविण मरगळे | Updated: January 5, 2021 11:35 IST

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणारा शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला

ठळक मुद्देआत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंगने बाकोर पोलिस ठाण्यात फोन केला असता तपासात निष्पन्न झालं आहे.सरकारी कर्मचारी आपले काम करीत नाहीत त्यासाठी मी आत्महत्या करणार आहेबलवंतसिंगच्या खिशातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदार आणि महिसागरचे आमदाराचं नाव

महिसागर - कृषी कायद्याबाबत देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. याचवेळी गुजरातमधील महिसागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एका शेतकऱ्याने पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा शेतकरी वारंवार शासकीय मदतीसाठी पंचायत कार्यालयात चक्कर मारत होता. मात्र शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्याने तो नाराज होऊन हे टोकाचं पाऊल उचललं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणाऱ्या शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्याच्या घरी गोंधळ उडाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली असल्याचं समजलं आहे. ज्यात म्हटलं आहे की, “माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबांचे काम कोणी केले नाही.”

आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना लावला फोन

आत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंगने बाकोर पोलिस ठाण्यात फोन केला असता तपासात निष्पन्न झालं आहे. हा फोन पंचायत कार्यालयातून करण्यात आला होता. त्या वेळी शेतकर्‍याने पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले की सरकारी कर्मचारी आपले काम करीत नाहीत त्यासाठी मी आत्महत्या करणार आहे. मात्र पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असा आरोप आहे. त्याचा परिणाम शेतक्याने आपला जीव दिला.

सुसाईड नोटमध्ये खासदार-आमदाराच्या नावाचा उल्लेख  

आत्महत्या केलेल्या बलवंतसिंगच्या खिशातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदार आणि महिसागरचे आमदार जिग्नेश सेवक या दोघांची नावे लिहिली असल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: ही घटना अशावेळी घडली जेव्हा सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करत आहे

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, सेवकचा अर्थ सेवा देणे आहे परंतु असं सरकारी कार्यालयात होत नाही, मी एक गरीब माणूस आहे आणि वर्षानुवर्षे भाजपावर विश्वास ठेवतोय. माझ्या आत्म्यात भाजपा आहे. शेवटपर्यंत भाजपासोबत राहिलो. माझा मृत्यू झाला तरी मी भाजपावर विश्वास ठेवत राहीन. पक्षात अजूनही माझा आत्मा आहे, पण गरीब असल्याने मला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाने केला आरोप

बलवंतसिंग यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मुलगा राजेंद्रच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांनी स्वत:च्या जमिनीचा काही भाग विकून घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पाच वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेच्या मदतीसाठी अर्ज करत होते. या यादीत त्यांचे नावही आले, परंतु पंचायत कार्यालयाकडून त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही असा आरोप त्याने केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीBJPभाजपाPoliceपोलिस