शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

“माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबाचे कोणीही काम केले नाही”

By प्रविण मरगळे | Updated: January 5, 2021 11:35 IST

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणारा शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला

ठळक मुद्देआत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंगने बाकोर पोलिस ठाण्यात फोन केला असता तपासात निष्पन्न झालं आहे.सरकारी कर्मचारी आपले काम करीत नाहीत त्यासाठी मी आत्महत्या करणार आहेबलवंतसिंगच्या खिशातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदार आणि महिसागरचे आमदाराचं नाव

महिसागर - कृषी कायद्याबाबत देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. याचवेळी गुजरातमधील महिसागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एका शेतकऱ्याने पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा शेतकरी वारंवार शासकीय मदतीसाठी पंचायत कार्यालयात चक्कर मारत होता. मात्र शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्याने तो नाराज होऊन हे टोकाचं पाऊल उचललं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणाऱ्या शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्याच्या घरी गोंधळ उडाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली असल्याचं समजलं आहे. ज्यात म्हटलं आहे की, “माझ्या आत्म्यात अजूनही भाजपा आहे, परंतु माझ्या गरीबांचे काम कोणी केले नाही.”

आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना लावला फोन

आत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंगने बाकोर पोलिस ठाण्यात फोन केला असता तपासात निष्पन्न झालं आहे. हा फोन पंचायत कार्यालयातून करण्यात आला होता. त्या वेळी शेतकर्‍याने पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले की सरकारी कर्मचारी आपले काम करीत नाहीत त्यासाठी मी आत्महत्या करणार आहे. मात्र पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असा आरोप आहे. त्याचा परिणाम शेतक्याने आपला जीव दिला.

सुसाईड नोटमध्ये खासदार-आमदाराच्या नावाचा उल्लेख  

आत्महत्या केलेल्या बलवंतसिंगच्या खिशातून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी खासदार आणि महिसागरचे आमदार जिग्नेश सेवक या दोघांची नावे लिहिली असल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: ही घटना अशावेळी घडली जेव्हा सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करत आहे

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, सेवकचा अर्थ सेवा देणे आहे परंतु असं सरकारी कार्यालयात होत नाही, मी एक गरीब माणूस आहे आणि वर्षानुवर्षे भाजपावर विश्वास ठेवतोय. माझ्या आत्म्यात भाजपा आहे. शेवटपर्यंत भाजपासोबत राहिलो. माझा मृत्यू झाला तरी मी भाजपावर विश्वास ठेवत राहीन. पक्षात अजूनही माझा आत्मा आहे, पण गरीब असल्याने मला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाने केला आरोप

बलवंतसिंग यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मुलगा राजेंद्रच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांनी स्वत:च्या जमिनीचा काही भाग विकून घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पाच वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेच्या मदतीसाठी अर्ज करत होते. या यादीत त्यांचे नावही आले, परंतु पंचायत कार्यालयाकडून त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही असा आरोप त्याने केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीBJPभाजपाPoliceपोलिस