शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरूणीला घेऊन पळाला नवरदेव, नवरीने पोलिसांकडे केली न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:19 IST

Groom run away with other girl on marriage day : हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेव पळून गेल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेव दुसऱ्याच तरूणीला घेऊन (Groom run away with other girl on marriage day) पळाला. ज्यामुळे नवरीच्या घरी एकच गोंधळ झाला. त्यानंतर नवरदेवाकडील लोकांनी फोन करून ते वरात आणत नसल्याचं सांगितलं. यासंबंधी तक्रार देण्यासाठी नवरी आणि तिची आई पोलीस स्टेशनमध्ये गेल्या.

हमीरपूर जिल्ह्यातील राठ भागातील पठाणपुरा मुहाल येथे राहणाऱ्या विद्या देवी यांचा पती शिवकुमार यांचं २० वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांनी आपल्या दोन मुलींना वाढवण्यासाठी मोलमजुरी केली. मोठी मुलगी उषाचं लग्न चार वर्षाआधीच केलं होतं. तर लहान मुलगी २० वर्षीय अनीताचं लग्न कानपूर नगरच्या दर्शनपुरवामध्ये ठरलं होतं.

अनीताचं लग्न दर्शनपुरवा येथील राहुल वर्मासोबत जुळवण्यात आलं होतं. १० मे रोजी वरात येणार होती. ज्यासाठी दोन्ही घरात सर्व तयारी पूर्ण झाली होती. लग्नात सहभागी होण्यासाठी नातेवाईकही आले होते. रविवारी घरातील मंडपात रितीरिवाज होणार  होते. हळदीच्या कार्यक्रमात संगीत वाजत होतं. तेव्हाच नवरदेवाच्या नातेवाईकांनी फोन करून वरात आणणार नसल्याचं सांगितलं.

ऐनवेळी वरात आणण्यास नकार दिल्याने सगळे लोक हैराण झाले. नवरीची आई विद्या देवी यांनी सांगितलं की, नवरदेवाचा भाऊ अनिलने फोन माहिती दिली की, राहुल दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. त्यामुळे ते वरात आणू शकत नाही आणि त्याने फोन बंद केला.

मुलीला घेऊन आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्यांनी तक्रार दाखल केली. दोघींनी तक्रार दाखल करत पोलिसांकडे न्यायाची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रार दाखल करून घेतली आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी