शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

शुभमंगल सावधान म्हणण्यापूर्वीच वधूला सोडून वर पसार, समोर आलं धक्कादायक कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 19:49 IST

Marriage News: विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली.

जयपूर - राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील तारपुरा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विवाहाचे विधी सुरू होते. मात्र विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली. मात्र तिला कसलीच खबर लागून न देता नवरदेव पळून गेला. दरम्यान, ऐन लग्नसोहळ्यातून वर पसार होण्यामागे हुंड्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या लोभी नवरदेवाला धडा शिकवण्यासाठी वधूने आज थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच वरावर कठोर कारवाईची मागणी केली. (Groom ran away with the procession leaving the bride amidst the wedding Hall )

मिळालेल्या माहितीनुसार तारपुरा गावातील सूरजा राम जांगिड यांची मुलगी सुभिता हिचा विवाह बुगाला गावातील रहिवासी असलेल्या अजय याच्यासोबत निश्चित झाला होता. ३ जुलै रोजी संध्याकाळी अजय याची वरात सुभिताच्या घरी आली. वऱ्हाडी मंडळींनी चहा नाश्ता घेतला. त्यानंतर वरमाला घालण्याचा कार्यक्रम झाला मात्र या कार्यक्रमादरम्यानच वर पक्षाने हुंड्याची मागणी सुरू केली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी मंडपातून काढता पाय घेतला. काही वेळाने वर आणि त्याचे सहकारीही वधूला सोडून निघून गेले.

सप्तपदीच्या वेळी जेव्हा वधूच्या कुटुंबाला याची माहिती मिळाली. त्यानंतर मागचे दोन दिवस दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र त्यातून कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेरीस वधूचे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांजवळ पोहोचले. वराच्या कुटुंबीयांनी हुंड्याबाबत आपल्याला मारहाण केली आणि शिविगाळही केली. आपण वराच्या कुटुंबीयांना खूप विनवणी केली. मात्र ते वरात घेऊन परत गेले.

दरम्यान, वधूने पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षभरापासून अजय हा तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. मात्र आता तो तिला सोडून गेला आहे. या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी वधूपक्ष पोलिसांवरही आरोप करत होता. अखेरीस त्यांना पोलीस अधिक्षकांकडे धाव घ्यावी लागली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थान