शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शुभमंगल सावधान म्हणण्यापूर्वीच वधूला सोडून वर पसार, समोर आलं धक्कादायक कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 19:50 IST

Marriage News: विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली.

जयपूर - राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील तारपुरा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे विवाहाचे विधी सुरू होते. मात्र विवाहसोहळ्यात वरमाला आणि सप्तपदीचा विधी होण्यापूर्वी वर आणि वऱ्हाडी मंडळी मंडपातून पसार झाली. इकडे वधू सप्तपदीची वाट पाहत राहिली. मात्र तिला कसलीच खबर लागून न देता नवरदेव पळून गेला. दरम्यान, ऐन लग्नसोहळ्यातून वर पसार होण्यामागे हुंड्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या लोभी नवरदेवाला धडा शिकवण्यासाठी वधूने आज थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच वरावर कठोर कारवाईची मागणी केली. (Groom ran away with the procession leaving the bride amidst the wedding Hall )

मिळालेल्या माहितीनुसार तारपुरा गावातील सूरजा राम जांगिड यांची मुलगी सुभिता हिचा विवाह बुगाला गावातील रहिवासी असलेल्या अजय याच्यासोबत निश्चित झाला होता. ३ जुलै रोजी संध्याकाळी अजय याची वरात सुभिताच्या घरी आली. वऱ्हाडी मंडळींनी चहा नाश्ता घेतला. त्यानंतर वरमाला घालण्याचा कार्यक्रम झाला मात्र या कार्यक्रमादरम्यानच वर पक्षाने हुंड्याची मागणी सुरू केली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी मंडपातून काढता पाय घेतला. काही वेळाने वर आणि त्याचे सहकारीही वधूला सोडून निघून गेले.

सप्तपदीच्या वेळी जेव्हा वधूच्या कुटुंबाला याची माहिती मिळाली. त्यानंतर मागचे दोन दिवस दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र त्यातून कुठलाही तोडगा न निघाल्याने अखेरीस वधूचे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांजवळ पोहोचले. वराच्या कुटुंबीयांनी हुंड्याबाबत आपल्याला मारहाण केली आणि शिविगाळही केली. आपण वराच्या कुटुंबीयांना खूप विनवणी केली. मात्र ते वरात घेऊन परत गेले.

दरम्यान, वधूने पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षभरापासून अजय हा तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. मात्र आता तो तिला सोडून गेला आहे. या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी वधूपक्ष पोलिसांवरही आरोप करत होता. अखेरीस त्यांना पोलीस अधिक्षकांकडे धाव घ्यावी लागली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थान