शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

दोस्त दोस्त ना रहा! लग्नाच्या १५ दिवसांपूर्वीच मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन ‘तो’ फरार झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 09:38 IST

अमितसोबत ब्रेक अप झाल्यानंतर युवती बादलच्या प्रेमात पडली. मागील ६ वर्षापासून बादल आणि युवतीचं प्रेम प्रकरण सुरू होतं

जोधपूर – मैत्री म्हटलं की विश्वासाचं नातं. या विश्वासाला तडा गेला तर मैत्रीला काहीच अर्थ नाही. राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक अजब प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी लग्नाच्या १५ दिवस आधी युवकाने मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेला. या प्रकाराची पोलिसांना माहिती लागताच त्यांनी युवक आणि युवतीला शोधून काढत दोघांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. घडलेला प्रकार ऐकून मित्रांसह कुटुंबीयांनाही धक्काच बसला.

जोधपूरच्या रातानाडा परिसरातील ही घटना आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एका कुटुंबाने त्यांच्या घरातील मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. नातेवाईकांनी तक्रारीत म्हटलं की, त्यांची मुलगी जी नर्सिंग करत होती. ती शुक्रवारपासून घरातून बेपत्ता आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता मुलगी पाबुपुराचा रहिवासी असलेल्या बादल नायक नावाच्या युवकासोबत लग्नासाठी पळून गेली होती. बादल आणि युवतीला पोलिसांनी  शोधत चौकशी केली तेव्हा दोघंही लग्न करण्यासाठी घरातून पळाल्याचं त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

बादल नायक हा त्याचा मित्र अमित याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळाला होता. अमितसोबत ब्रेक अप झाल्यानंतर युवती बादलच्या प्रेमात पडली. मागील ६ वर्षापासून बादल आणि युवतीचं प्रेम प्रकरण सुरू होतं. परंतु याच काळात बादलचं लग्न ठरलं. १४ नोव्हेंबरला बादलच्या कुटुंबीयांना लग्न धुमधडाक्यात करण्याची तयारी सुरू केली. रातनाडा पोलीस ठाण्याचे पोलीस एसआय भंवर सिंह यांनी सांगितले की, बादल याचं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं. त्या मुलीने बादलविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्याचसोबत रागाच्या भरात होणाऱ्या नवरीनं पोलीस ठाण्यात येऊन बादलला कानशिलात लगावली. पोलिसांनी हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणात बादलविरोधात फसवणुकीचाही गुन्हा नोंदवला आहे.

बादल याचं लग्न ठरल्यानंतर त्याने युवतीसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवती आणि बादलनं एकमेकांशी फोनवर संवाद साधत घरातून पळून लग्न करूया असं ठरवलं. बादल आणि युवती घरातून पळून लग्न करणार होते. परंतु शनिवार असल्याने त्यांना लग्न करता आलं नाही. युवतीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी सर्च करत दोघांना ताब्यात घेतलं.  

 

टॅग्स :marriageलग्नRajasthanराजस्थान