शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

किराणा दुकानदाराने आर्थिक विवंचनेतून लातुरात केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 22:10 IST

Suicide Case : याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस कर्मचारी सय्यद करीत आहेत.

ठळक मुद्दे उल्हास रावसाहेब पाटील (४५) असे मयत दुकानदाराचे नाव आहे.

लातूर : आर्थिक विवंचनेतून एका किराणा दुकानदाने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना लातुरातील एलआयसी काॅलनीत मंगळवारी पहटाेच्या सुमारास घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. उल्हास रावसाहेब पाटील (४५) असे मयत दुकानदाराचे नाव आहे.पाेलिसांनी सांगितले, मयत उल्हास रावसाहेब पाटील (रा. प्रगती नगर, एलआयसी काॅलनी, लातूर) यांचे परिसरात किराणा दुकान आहे. ते गेल्या काही वर्षांपासून किराणा दुकानाचा व्यवसाय करत हाेते. दरम्यान, काेराेनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर त्यांच्या व्यवायाला घरघर लागली हाेती. यातूनच त्यांच्या डाेक्यावर कर्जाचा डाेंगर वाढत गेला़ दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्जाची परतफेड कशी करायची? याच विवंचनेतून ते अलिकडे तणावात हाेते. काही दिवासांपासून ते घरात काेणालाही फारसे बाेलतही नव्हते. अखेर आर्थिक विवंचेनतूत त्यांच्यामध्ये नैराश्य आले. याच नैराश्यातून त्यांनी मंगळवारी पहाटे एलआयसी काॅलनी परिसरात असलेल्या एका मंदिरानजीक लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपविले. ही घटना सकाळी समाेर आली. याबाबत आनंद बाबासाहेब जाधव (रा. प्रगती नगर, एलआयसी काॅलनी, लातूर) यांनी विवेकानंद चाैक पाेलिसांना माहिती दिली. पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. कर्जबाजारीपणामुळे उल्हास पाटील यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे, असे पाेलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस कर्मचारी सय्यद करीत आहेत.दिवाळी आले हाेते आई-बाबा...मयत उल्हास पाटील यांचे वृद्ध आई-बाबा गावाकडून दिवाळी सणानिमित्ताने लातुरात आले हाेते. दरम्यान, मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याने त्यांच्यावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-बाबा, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आत्महत्या करण्यापाठिमागचे खरे कारण कुटुंबियांच्या जबाबातून समाेर येणार आहे, असे तपासिक अंमलदार सय्यद यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरPoliceपोलिस