शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बिद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांचे सरकारी वकिलांना असहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 21:18 IST

आयुक्तांकडे लेखी तक्रार : खटल्यातून बाहेर पडण्याचा इशारा

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना पत्राद्वारे नाराजी व्यक्त करत खटला सोडण्याचा इशारा दिला आहे.आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे.

नवी मुंबई - सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे नाराजी व्यक्त करत खटला सोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांचीच भूमिका वादात सापडली आहे.महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र घरत यांची नेमणूक होऊन महिना उलटला तरीही अद्याप खटल्यासंदर्भातील आवश्यक माहिती नवी मुंबईपोलिसांकडून मिळालेली नाही.विशेष म्हणजे आलिबाग कोर्टात गेल्या तीन केसची सुनावणी झाली. त्या सुनावणीवेळी प्रमुख तपास अधिकारीच गैरहजर होते. त्यावरून पोलिसांकडून अप्रत्यक्ष आरोपींना मदत होत असल्याचाही संशय अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अलिबाग कोर्टानेही यावर नाराजी व्यक्त केली असून नवी मुंबई पोलिसांना या खटल्यात रस का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे एकीकडे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना केसची कागदपत्र न देणे आणि दुसरीकडे अलिबाग कोर्टातही हजर न राहणे यावरून सरकारी वकील घरत यांनी नाराजी व्यक्त करीत खटल्यातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना लेखी पत्र देखील पाठवले आहे. १ जूनपर्यंत तपास अधिकाऱ्यांनी खटल्याबाबत आपल्याला कोणतेही कागदपत्र न दिल्यास आपण खटल्यातून बाहेर पडणार असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सुरुवातीपासून या प्रकरणात पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आले आहेत. त्यांच्यावर नक्कीच कुणाचातरी दबाव असल्याने पोलिसांमार्फत केसमध्ये जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नाही.- राजीव गोरे, अश्विनी बिद्रे यांचे पती

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईadvocateवकिल